शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सुसंस्कारित माणूस घडविण्याची साहित्यात ताकद

By admin | Updated: January 17, 2016 00:36 IST

विठ्ठल वाघ : सांगलीवाडीतील एकदिवसीय ज्ञानभारती साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : शाळांमध्ये समृध्द ग्रंथालये असताना, त्याचा किती विद्यार्थी वापर करतात, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ शिक्षणासाठी पुस्तके न वाचता विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिध्द करण्यासाठी पुस्तके वाचावीत. मात्र, वाचन कमी झाल्याने संस्कारहीन पिढी निर्माण होण्याचा धोका वाढला असून, मनाला संस्कारित करण्याची आणि माणसाला घडविण्याची ताकद साहित्यात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखकविठ्ठल वाघ यांनी शनिवारी केले. सांगलीवाडीतील पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन वाघ बोलत होते. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम संमेलनाच्या स्वागताध्यक्षा होत्या. वाघ म्हणाले की, डोळ्यासमोर टीव्ही आणि हातात मोबाईल असलेल्या पिढीचे वाचन कमी होत चालले आहे. कुटुंबातील व्यक्तींना दैनंदिन कामाच्या व्यापातून मुलांवर संस्कार करण्याची वेळच नसल्याने हे संस्कार करण्याचे काम पुस्तके प्रभावीपणे करू शकतात. आज महागाईतच गुरफटून गेलेल्या पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. या दूषित वातावरणात आता शिक्षकांनी भान ठेवून या मुलांच्या आई, वडील, भाऊ आणि मित्राची भूमिका पार पाडत संस्कार करणे गरजेचे आहे. लिहिणाऱ्यांनी कल्पनेतून लिखाण न करता परिसरातील घटनांचे प्रतिबिंब कसे उमटेल, हे पहावे. ते म्हणाले की, शून्यातून सृष्टी निर्माण करण्याची ताकद श्रमात असते. तरुणांनी स्वप्न पाहणे चांगलेच, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची आवश्यकता असून, त्या श्रमाला घामाचा वास आला पाहिजे. विजयमाला कदम म्हणाल्या की, केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांचेही वाचन कमी होत आहे. वाचन वाढविल्याशिवाय सखोल माहिती देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही ग्रंथालयाचा वापर वाढवावा. संमेलनात दुपारच्या सत्रात ‘साहित्य, समाज आणि शिक्षण’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. ‘माझे लेखनानुभव’ या विषयावर डॉ. मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. यानंतर कथाकथन, कविसंमेलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भारती विद्यापीठाचे मानद संचालक एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, संतोष काळे, प्रभा पाटील, सूर्यकांत बुरुंग, संतोष माने उपस्थित होते. प्राचार्य डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. बी. डी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) वाघाची बकरी झाली! शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारताना प्रशासकाची दमछाक होत असते. त्यामुळे भारती विद्यापीठाने गुणवत्ता टिकविताना केलेल्या प्रयत्नांना दाद दिलीच पाहिजे. कारण शैक्षणिक बदल आणि त्यांची अंमलबजावणी करतानाचा मला प्राचार्य म्हणून अनुभव असून, हे बदल करताना या वाघाचीही बकरी झाली होती, असे वाघ यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. शिकार होऊ देऊ नका! आजच्या तरुण पिढीपुढे वेगवेगळ्या माध्यमातून आमिषांचे जाळे निर्माण होत असून, त्यापासून तरुणांनी विशेषत: मुलींनी दूर राहणे गरजेचे आहे. आमिषे दूर ठेवल्याने आई-वडिलांनाही आधार मिळतो. मुलींनो, कोणाकडून आपली शिकार होऊ देऊ नका, असे आवाहनही वाघ यांनी केले.