शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात जयंत पाटील गटाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा शहरात ३ दिवस बुथनुसार बैठका घेऊन नागरिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा शहरात ३ दिवस बुथनुसार बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जागेवरच या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या बैठकांमुळे शहरातील मंत्री जयंत पाटील गटाला बळ मिळाले आहे.

आष्टा पालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे व मंत्री जयंत पाटील गटाची निर्विवाद सत्ता आहे. नव्वदच्या दशकानंतर दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर आष्टा पालिकेचा कारभार माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू होता. विलासराव शिंदे असताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालिकेत लक्ष दिले नव्हते. विलासराव शिंदे शहरातील सर्व समस्यांबाबत बैठका घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील फक्त लोकसभा व विधानसभेच्या सुरुवात व शेवटच्या बैठकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असत.

मात्र विलासराव शिंदे यांच्या पश्चात मंत्री जयंत पाटील यांनी आष्टा पालिकेच्या विविध विकास कामांना कोट्यवधीचा निधी दिला आहे. लोकांच्या समस्या जागेवरच सोडवता याव्यात. या दृष्टिकोनातून मंत्री पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागात असलेल्या बुथ कमिटीच्या बैठका घेतल्या. सायंकाळी ६ पासून रात्री १२ ते १ वाजेपर्यंत मंत्री पाटील यांनी वेळ देऊन समस्या सोडवल्या.

या बैठकांत माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी शहरातील समस्या व यासाठी पालिकेने राबवलेल्या योजनांबाबत पाटील यांना माहिती दिली. नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, उज्ज्वला पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, बबन थोटे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.