शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

वादळी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या ...

पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी केला जाणारा जागर युवा पिढीला ताकद देत आहे.

नानासाहेब महाडिक जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना ताकद देत. त्यामुळे राज्य पातळीच्या नेत्यांपासून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण पेठनाक्यावरून जाताना नानांचे पाठबळ घेतल्याशिवाय कोल्हापूर, सांगलीकडे प्रयाण करत नव्हते. त्यांचे पाठबळ म्हणजे विजय, हे राजकीय समीकरण सांगली जिल्ह्यात स्थिरावले असतानाच त्यांचे अचानक निधन झाले आणि जिल्ह्यातील राजकारणात पोकळी निर्माण झाली.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंडखोरी करून लढविलेल्या विधान परिषदेच्या दोन निवडणुका त्यांच्या जीवनातल्या राजकारणातल्या धाडसी आठवणी ठरल्या आहेत. दिलेला शब्द पाळणे, हे त्यांचे गुणवैशिष्ट्य सर्वसामान्य जनतेत रुजले होता. त्यांच्या दारी गेलेला कोणीही भरल्या हाताने आणि आठवणीनेच परतत होता. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत नाना हे राजकीय सल्ल्याचे विद्यापीठ होते. सांगलीतील वसंतदादा घराण्यातील राजकारणाला शिस्त लावण्याचे काम त्यांनीच केले.

कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील महाडिक घराण्याचे राजकारण पेठनाक्यावरील ‘नाना महाडिक पॅटर्न’शिवाय पुढे सरकत नव्हते. आता त्यांची उणीव भासू लागली आहे. मुळातच त्यांच्या रक्तात देशसेवेचा सैनिकी बाणा होता. त्यामुळे निवृत्त सैनिकांंच्या संघटनेचे ते आधारस्तंभ होते. पैलवानकी पेशा असल्याने नानांना कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पैलवान वस्तादांचा मान देऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय मैदानाला जात नसत. आज बदलत्या राजकीय समीकरणांत त्यांच्या कार्यकर्त्यांना नानांची आठवण पदोपदी येते. नानांचा विचार घेऊन महाडिक युवा शक्ती भविष्यातील राजकारणाचा वेध घेत आहे.

अशोक पाटील, प्रतिनिधी