शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वादळी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या ...

पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी केला जाणारा जागर युवा पिढीला ताकद देत आहे.

नानासाहेब महाडिक जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना ताकद देत. त्यामुळे राज्य पातळीच्या नेत्यांपासून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण पेठनाक्यावरून जाताना नानांचे पाठबळ घेतल्याशिवाय कोल्हापूर, सांगलीकडे प्रयाण करत नव्हते. त्यांचे पाठबळ म्हणजे विजय, हे राजकीय समीकरण सांगली जिल्ह्यात स्थिरावले असतानाच त्यांचे अचानक निधन झाले आणि जिल्ह्यातील राजकारणात पोकळी निर्माण झाली.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंडखोरी करून लढविलेल्या विधान परिषदेच्या दोन निवडणुका त्यांच्या जीवनातल्या राजकारणातल्या धाडसी आठवणी ठरल्या आहेत. दिलेला शब्द पाळणे, हे त्यांचे गुणवैशिष्ट्य सर्वसामान्य जनतेत रुजले होता. त्यांच्या दारी गेलेला कोणीही भरल्या हाताने आणि आठवणीनेच परतत होता. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत नाना हे राजकीय सल्ल्याचे विद्यापीठ होते. सांगलीतील वसंतदादा घराण्यातील राजकारणाला शिस्त लावण्याचे काम त्यांनीच केले.

कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील महाडिक घराण्याचे राजकारण पेठनाक्यावरील ‘नाना महाडिक पॅटर्न’शिवाय पुढे सरकत नव्हते. आता त्यांची उणीव भासू लागली आहे. मुळातच त्यांच्या रक्तात देशसेवेचा सैनिकी बाणा होता. त्यामुळे निवृत्त सैनिकांंच्या संघटनेचे ते आधारस्तंभ होते. पैलवानकी पेशा असल्याने नानांना कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पैलवान वस्तादांचा मान देऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय मैदानाला जात नसत. आज बदलत्या राजकीय समीकरणांत त्यांच्या कार्यकर्त्यांना नानांची आठवण पदोपदी येते. नानांचा विचार घेऊन महाडिक युवा शक्ती भविष्यातील राजकारणाचा वेध घेत आहे.

अशोक पाटील, प्रतिनिधी