शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अनिलभाऊ नावाचं वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार भाऊंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यांसह विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या शेतीला ...

शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार भाऊंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यांसह विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभू, आरफळ व ताकारी योजनेचे पाणी देऊन दुष्काळी शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आमदार अनिलभाऊ आजही काम करीत आहेत. दुष्काळी शेतकऱ्यांचा आश्वासक नेता म्हणून ते सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले आहेत.

केवळ सत्तेसाठी राजकारण न करता शेतकरी व सर्वसामान्य जनता आणि मतदारसंघाचा विकास हेच ध्येय समोर ठेवून आमदार अनिलभाऊंनी उचललेले विकासाचे पाऊल कौतुकास्पद आहे. त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्यासाठी योजनेला गती दिली आहे. त्यामुळेच आज खानापूरच्या पूर्व भागातील अग्रणी नदी टेंभूच्या पाण्याने खळखळून वाहू लागली आहे. तसेच खानापूर, लेंगरे यांसह तालुक्यातील विविध पाझर तलावांत टेंभूचे पाणी सोडून दुष्काळी परिसरात भूजल पातळीवर मोठी वाढ झाली आहे. आमदार अनिलभाऊंनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केलेले काम आजही दखलपात्र आहे. खानापूर पूर्व भागाला दिलासा देण्यासाठी टेंभू योजनेचे आणखी दोन टप्पे पूर्णत्वासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पळशीसह अन्य गावांचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे व दुष्काळी शेतीपाण्याचा प्रश्न घेऊन प्रसंगी सरकारविरुद्ध संघर्ष करण्याची तयारीही आ. अनिलभाऊंनी ठेवली आहे. खानापूर मतदारसंघात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकारदरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार भाऊंचे प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला.

द्राक्ष बागायतदारांना प्लास्टिक आच्छादन, कर्जमाफी यांसह शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी आमदार भाऊ आजही प्रयत्नशील आहेत. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी आणून वंचित गावांचा योजनेत समावेश करण्यासाठी आमदार भाऊंनी शासनदरबारी पाठपुरावा केला. खानापूर मतदारसंघात आता टेंभूचे पाणी आले. आता विजेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने त्यांनी नुकतीच मंत्रालयात ऊर्जामंत्र्यांच्या दालनात शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्याबाबत सकारात्मक चर्चा केली. आमदार अनिलभाऊंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत यंत्रमाग व पोल्ट्री व्यवसायाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यासमोर आमदार अनिलभाऊंनी शेतकरी, यंत्रमाग व पोल्ट्री उद्योजकांच्या व्यथा मांडून दुष्काळी खानापूर मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आ. अनिलभाऊ हे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी आजही लढत आहेत.

मतदारसंघातील दुष्काळी जनतेच्या प्रश्नांवर काम असल्यामुळे आ. अनिलभाऊंचा विविध विषयांचा सखोल अभ्यास आहे. आपल्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटेल असे त्यांचे काम आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैया बाबर यांनीही आ. अनिलभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम करून दुष्काळी खानापूर मतदारसंघाला न्याय मिळवून दिला आहे. नगरसेवक अमोलदादा व सुहासभैया यांनी मतदारसंघात युवा संघटन मजबूत करून आ. अनिलभाऊंच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. आ. भाऊंनी कार्यकर्त्यांनाही मोठी ताकद दिली आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याचे काम आ. भाऊंनी करून सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. खानापूर मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आ. भाऊंनी मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग, जलसिंचन योजना, वीज, रस्ते, आरोग्य यांसह अनेक प्रश्नांना आ. भाऊंनी प्राधान्य देऊन ते प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळेच आज मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून त्यांना पूर्ण ताकद दिली आहे. आगामी काळातही केवळ शेतीपाण्याचा प्रश्न सोडवून टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्याचे ध्येय आ. भाऊंनी ठेवले आहे. राजकारणातून समाजकारणाला प्राधान्य देऊन काम करीत असताना कितीही संकटे आली तरी त्यांनी खचून न जाता मोठ्या धाडसाने मतदारसंघाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे अनिलभाऊ नावाचं वादळ आज खानापूर मतदारसंघात घोंघावत आहे. त्यांचा आज, गुरुवारी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

-दिलीप मोहिते, विटा.

फोटो - ०६०१२०२१-विटा-अनिलभाऊ बर्थडे ०१ : लेंगरे ते माधळमुठी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आ. अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - ०६०१२०२१-विटा-अनिलभाऊ बर्थडे ०२ : मुंबई येथे डाळींब बागांसाठी प्लास्टिक आच्छादनास अनुदान मिळावे यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात आ. अनिलभाऊ बाबर यांनी बैठकीचे आयोजन केले होते.