शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:34 IST

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून ...

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, उद्योजक माधव कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, सांगली मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय सेवा व कर कार्यालयाकडून ३० जुलै २०१२ पासूनच्या अडत व कमिशनवरील सेवाकर भरण्याच्या नोटिसा आल्या आहेत. नोटिशीनुसार दंड भरण्याची व दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात फक्त सांगलीतच व्यापाºयांना सेवाकराच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी पंधरा दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत सेवाकराच्या अन्यायकारक नोटिसीविरोधात दाद मागितली होती. त्यांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अधिकाºयांकडून कारवाई सुरू केल्यानेच याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड व्यापाºयांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे.कायदा हा सर्वत्र समान असला पाहिजे, मात्र संपूर्ण देशात कुठेही नोटिसा न देता केवळ सांगलीत अशाप्रकारच्या नोटिसा देऊन अधिकाºयांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. सणासुदीच्या काळातच व्यापाºयांना स्वत:चे नुकसान करून बंदचे आंदोलन नाईलाजास्तव पुकारावे लागत आहे. वास्तविक येथील व्यापाºयांना किती कमिशन घ्यायचे हे ठरलेले आहे. एक रुपयासुद्धा शेतकºयांकडून जादा घेतला तर, आमचे परवाने रद्द होऊ शकतात. पणन विभागाने त्यासंदर्भात आदेशच दिले आहेत. तरीही जीएसटी विभाग आमच्याकडून अशाप्रकारच्या अपेक्षा का बाळगत आहे. पणनचा कोणताही आदेश नसताना व्यापारी कोणताही कर कसा गोळा करू शकतात? त्यामुळे संबंधित अधिकाºयांनी त्यांनी मनमानी बंद करावी. बुधवारी सायंकाळी पुन्हा बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असे ते म्हणाले.कोणाची सुपारी : घेतली आहे?संबंधित वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाºयांनी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांची सुपारी घेतली आहे का, अशी आम्हाला शंका वाटत आहे, असे माधव कुलकर्णी म्हणाले. मंत्री, खासदार, आमदार यांचे आदेशही न मानणाºया या अधिकाºयांच्या कारवाई करण्यामागे नेमके गणित काय आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.