शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

तासगावात कारभारी निष्क्रिय; खासदार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:14 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संयजकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी ...

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संयजकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी थेट कनेक्ट होत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी खासदार पाटील यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या चार वर्षांतील पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहिल्यामुळे ‘कारभारी निष्क्रिय आणि खासदार सक्रिय’ असाचा प्रकार राहिला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवूनदेखील निवडणुकीच्या तोंडावर खासदारांनाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

तासगाव नगरपालिकेत गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि तासगाव नगरपालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलल्यामुळे विकासकामांसाठी खासदार पाटील यांनी सत्तेचा पुरेपूर उपयोग करून तासगाव शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला. एकीकडे खासदारांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असताना, दुसरीकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारनामे जोमोने सुरू होते.

सत्ताधाऱ्यांकडून मिळालेल्या निधीला नियमांची चाकोरी तयार करण्यात आली. विकासकामांचा दिखावा करत निधीवर डल्ला मारण्याचे कारनामे सुरू राहिले. चार वर्षांत सत्ताधाऱ्यांचा कारभार वादग्रस्त राहिला. स्वच्छता ठेक्यापासून प्रभागात होणाऱ्या किरकोळ काँक्रिटीकरणाच्या कामापर्यंत सत्तेतील बहुतांश कारभारांनी नेहमीच इंटरेस्ट दाखवला. बगलबच्च्यांच्या नावावर कामे घेण्यापासून ते ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी घेण्यापर्यंत अनेकदा चर्चा होत राहिल्या. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काही अपवाद वगळता बहुतांश नगरसेवकांना लोकांच्या मनात कामातून ठसा उमटवण्यात सपशेल अपयश आले.

नगरपालिका निवडणूक काही महिन्यानंतर होणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता कायम ठेवण्याचा आव्हान खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच खासदार पाटील यांनी स्वत: मैदानात उतरून लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

चौकट :

खासदारांचा पहिल्यांदाच जनता दरबार

खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी रात्री शहरातील बापूवाडी, अमृतेश्‍वरनगर परिसरातील नागरिकांशी जनता दरबाराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. खासदार पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच कनेक्ट होण्याचा उपक्रम राबविल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.