शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तासगावात कारभारी निष्क्रिय; खासदार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संजयकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले ...

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संजयकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी थेट कनेक्ट होत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या चार वर्षांतील पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहिल्यामुळे कारभारी निष्क्रिय आणि खासदार सक्रिय असाचा प्रकार राहिला आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवूनदेखील निवडणुकीच्या तोंडावर खासदारांनाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. तासगाव नगरपालिकेत गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि नगरपालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलल्यामुळे विकासकामांसाठी खासदार पाटील यांनी सत्तेचा पुरेपुर उपयोग करून कोट्यवधींचा निधी मिळवला. दुसरीकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारनामे जोमाने सुरू होते.

निधीला नियमांची चाकोरी तयार करण्यात आली. विकासकामांचा दिखावा करत निधीवर डल्ला मारण्याचे कारनामे सुरू राहिले. चार वर्षांत कारभार वादग्रस्त राहिला. स्वच्छता ठेक्यापासून किरकोळ काँक्रिटीकरणाच्या कामापर्यंत सत्तेतील बहुतांश कारभारांनी नेहमीच ‘इंटरेस्ट’ दाखवला. बगलबच्च्यांच्या नावावर कामे घेण्यापासून ते ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी घेण्यापर्यंत अनेकदा चर्चा होत राहिल्या. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काही अपवाद वगळता बहुतांश नगरसेवकांना लोकांच्या मनात कामातून ठसा उमटवण्यात सपशेल अपयश आले.

सत्तेत येण्याआधी दिलेली आश्‍वासने हवेत विरली. जनतेच्या प्रश्‍नांसाठी अट्टाहास करण्याऐवजी केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठीच रस्सीखेच सुरू राहिली.

नगरपालिका निवडणूक काही महिन्यानंतर होणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता कायम ठेवण्याचा आव्हान खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: मैदानात उतरून लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत, प्रशासनाच्या माध्यमातून केलेली विकासकामे पोहोचविण्यासाठी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

खासदारांचा पहिल्यांदाच जनता दरबार

खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी रात्री शहरातील बापूवाडी, अमृतेश्‍वरनगर परिसरातील नागरिकांशी जनता दरबाराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. खासदार पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच कनेक्ट होण्याचा उपक्रम राबविल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.