शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:19 IST

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेचा फटका ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंदनोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस धरले वेठीस

सांगली, 4 : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना लगेच मुद्रांक मिळतात. ही शासनाची चुकीची पध्दत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात सध्या १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत.

नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे. जनतेला त्रास होत असल्यामुळे ते आम्हाला जाब विचारत आहेत. अनेकवेळा त्यांच्याशी संघर्षही करावा लागत आहे. यामुळे शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे त्याचे वाटप व्हावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई-चलन आणि ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावे, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा. एएसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.

पण, यावर त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. म्हणूनच दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मोहन वाघ यांनी दिला आहे.  आंदोलनाबाबत निवेदनही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.