शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:19 IST

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेचा फटका ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंदनोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस धरले वेठीस

सांगली, 4 : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना लगेच मुद्रांक मिळतात. ही शासनाची चुकीची पध्दत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात सध्या १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत.

नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे. जनतेला त्रास होत असल्यामुळे ते आम्हाला जाब विचारत आहेत. अनेकवेळा त्यांच्याशी संघर्षही करावा लागत आहे. यामुळे शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे त्याचे वाटप व्हावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई-चलन आणि ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावे, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा. एएसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.

पण, यावर त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. म्हणूनच दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मोहन वाघ यांनी दिला आहे.  आंदोलनाबाबत निवेदनही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.