शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:19 IST

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेचा फटका ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंदनोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस धरले वेठीस

सांगली, 4 : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना लगेच मुद्रांक मिळतात. ही शासनाची चुकीची पध्दत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात सध्या १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत.

नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे. जनतेला त्रास होत असल्यामुळे ते आम्हाला जाब विचारत आहेत. अनेकवेळा त्यांच्याशी संघर्षही करावा लागत आहे. यामुळे शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे त्याचे वाटप व्हावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई-चलन आणि ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावे, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा. एएसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.

पण, यावर त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. म्हणूनच दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मोहन वाघ यांनी दिला आहे.  आंदोलनाबाबत निवेदनही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.