शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:19 IST

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेचा फटका ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंदनोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस धरले वेठीस

सांगली, 4 : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना लगेच मुद्रांक मिळतात. ही शासनाची चुकीची पध्दत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात सध्या १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत.

नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे. जनतेला त्रास होत असल्यामुळे ते आम्हाला जाब विचारत आहेत. अनेकवेळा त्यांच्याशी संघर्षही करावा लागत आहे. यामुळे शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे त्याचे वाटप व्हावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई-चलन आणि ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावे, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा. एएसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.

पण, यावर त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. म्हणूनच दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मोहन वाघ यांनी दिला आहे.  आंदोलनाबाबत निवेदनही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.