शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकार आपलेसे वाटत नाही

By admin | Updated: May 3, 2016 00:37 IST

उद्धव ठाकरे : मानवंदना सभेत प्रतिपादन; पश्चिम महाराष्ट्राने कधीच सेनेला पूर्ण ताकद दिली नाही

सांगली : शिवरायांनी स्वराज्यातील जनतेला आपले मानले. जनताही त्यांच्यामागे राहिली. त्यामुळे शिवशाही सरकार आपलेसे वाटायचे. तशी आता स्थिती नाही. सरकार आपले आहे, अशी भावना जनतेत निर्माण होणारी कामे केली पाहिजेत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगलीतील सभेत व्यक्त केले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राने शिवसेनेला कधीच पूर्ण ताकद दिली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिव प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीतील शिवाजी क्रीडांगणावर हिंदवी स्वराज्य मानवंदना सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व हे राजकारणासाठी नसून, राज्याच्या हितासाठी आहे. आपले जवान देशाच्या सरहद्दीवर लढत असताना, आपण मात्र कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो. आमचे भांडण हिंदू-मुस्लिम असे नाही. औरंगजेबने हिंदूंची अनेक मंदिरे पाडली. पण शिवरायांनी एकही मशीद पाडली नाही. दुसऱ्या देशातील लोक भारतात आणि राज्यात राहत असतील, तर त्यांनी येथील संस्कृती मानली पाहिजे. ते म्हणाले, शिवाजी महाराज आग्रा येथे तुरुंगात असताना त्यांच्या राज्यात कोणीही बंडखोरी केली नाही. महाराजांचा इतिहास, त्यांची प्रेरणा, ध्येय व आदर्श याचा अलीकडच्या पिढीला विसर पडल्याचे दिसून येते. अफझलखान वधावरून आजही वादंग निर्माण केला जात आहे. जे सत्य आहे, ते आम्ही बोलणारच. शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे म्हणाले, देशाचे तारणहार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले, त्या बाळासाहेब ठाकरेंना मी उद्धव ठाकरे यांच्यात पाहतो. आजची तरुण पिढी शिवरायांचे जीवनचरित्र वाचायला तयार नाही. पण ते शिवजयंती साजरी करतात. जयंतीचे रूपही बदलत चालले आहे. शिवरायांचा ध्यास कायमचा धगधगत ठेवणारी जयंती साजरी झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जयंती साजरी करावी. प्रारंभी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर संभाजीराव भिडे यांच्याहस्ते ठाकरे यांचा तलवार व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. नीलम गोऱ्हे, आ. अनिल बाबर, शिरोळचे आ. उल्हास पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, बाळासाहेब बेडगे, सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) आता तशी स्थिती नाही!शिवरायांनी स्वराज्यावर आक्रमण करून आलेल्यांना सोडले नाही. पण मित्रांना त्यांनी कधीही दगा दिला नाही. शिवरायांनी स्वराज्यातील जनतेला आपले मानले. जनताही त्यांच्यामागे राहिली. त्यामुळे शिवशाही सरकार आपलेसे वाटायचे. तशी आता स्थिती नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवजयंतीपुरता भगवा नको!ठाकरे म्हणाले, शिवरायांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने सेनेला कधीही एकहाती सत्ता दिली नाही. भगव्यापासून आपण लांब निघालोय. केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरता हाती भगवा घेऊ नका. देशात आणि राज्यात सेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी शपथ घ्या. तुम्हाला अपेक्षित असा हिंदुस्थान निर्माण केला जाईल.आओ... जाओ घर तुम्हारा!ठाकरे म्हणाले, पाच ते सात कोटी बांगलादेशी लोक आपल्या देशात राहत असल्याची मला माहिती मिळाली आहे. पण आपले सैनिक तिकडे गेले, तर त्यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली जाते. अन्य देशातही घुसखोरांना विविध प्रकारची शिक्षा दिली जाते. आपल्या देशात मात्र तसे नाही. घुसखोरांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि निवडणुकीत उमेदवारीही दिली जाते. मंगलकलशअखंड महाराष्ट्र राहावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. यासाठी सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने अखंड महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे यांना मंगलकलश देण्यात आला.