शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:34 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे रयत क्रांतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून मंत्री खोत यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीला नमविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळेच इस्लामपूर शहरात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत बहुतांशी नेत्यांनी सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले होते, तर खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले आहे.दोनच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बहे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर बैठक घेतली. त्यावेळी तांबवे येथील राष्ट्रवादीचे माजी जि. प. उपाध्यक्ष व कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्यासह नेर्ले, तांबवे, काळमवाडी, बहे या परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्षारपड जमिनी पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत मंथन झाले. केंद्र शासनाच्या जलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून जमिनीत येणारे अतिरिक्त पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून बाहेर काढण्याची योजना अस्तित्वात आहे.यासाठी शेतकऱ्यांना ४0 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच केंद्र शासन ६0 टक्के निधी देणार आहे. ४0 टक्के शेतकºयांची रक्कम ही साखर कारखान्यांनी भरण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीची माहिती रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. त्याची माहिती तात्काळ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळे ‘ताकाला जाऊन मोगा का लपवायचा’ अशी मार्मिक टिपणी करुन खोत यांनी याला जादा महत्त्व दिले नाही.खेळी स्पष्ट : सदाभाऊंना शहकाळमवाडी येथील निघालेला ओढा सध्या पूर्णपणे बुजला आहे. या ओढ्याचा प्रवास काळमवाडी, नेर्ले, येवलेवाडी, तांबवे असा आहे. हे पाणी बहे तीळगंगा नदीला मिळते. हा पाण्याचा प्रवास कित्येक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हे पाणी परिसरातील जमिनींमध्ये मुरते. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र क्षारपड बनले आहे. याच जमिनीच्या उपाययोजनेसाठी खासदार शेट्टी यांनी बहे येथे तातडीने बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह देण्यासाठीच शेट्टींची खेळी असल्याचे जाणवत होते.गुलाल तिकडं चांगभलं..!कृष्णा कारखान्यात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व महाडिक गटाचे मिळून १0 संचालक आहेत. या संचालकांना कृष्णा कारखान्यावर गेले की भाजपचा झेंडा नाचवावा लागतो. राष्ट्रवादीचे ८ संचालक आहेत, तर काँग्रेसचे जितेंद्र पाटील आणि महाडिक गटाचे गिरीश पाटील हेही वाळवा तालुक्यातीलच आहेत. त्यांनाही कृष्णा कारखाना व तालुक्यात वेगवेगळी भूमिका राबवावी लागते. आता स्वाभिमानीला राष्ट्रवादीने जवळ केल्याने त्यांची स्थिती ‘गुलाल तिकडं चांगभलं’, अशीच आहे.