शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:34 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे रयत क्रांतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून मंत्री खोत यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीला नमविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळेच इस्लामपूर शहरात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत बहुतांशी नेत्यांनी सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले होते, तर खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले आहे.दोनच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बहे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर बैठक घेतली. त्यावेळी तांबवे येथील राष्ट्रवादीचे माजी जि. प. उपाध्यक्ष व कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्यासह नेर्ले, तांबवे, काळमवाडी, बहे या परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्षारपड जमिनी पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत मंथन झाले. केंद्र शासनाच्या जलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून जमिनीत येणारे अतिरिक्त पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून बाहेर काढण्याची योजना अस्तित्वात आहे.यासाठी शेतकऱ्यांना ४0 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच केंद्र शासन ६0 टक्के निधी देणार आहे. ४0 टक्के शेतकºयांची रक्कम ही साखर कारखान्यांनी भरण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीची माहिती रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. त्याची माहिती तात्काळ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळे ‘ताकाला जाऊन मोगा का लपवायचा’ अशी मार्मिक टिपणी करुन खोत यांनी याला जादा महत्त्व दिले नाही.खेळी स्पष्ट : सदाभाऊंना शहकाळमवाडी येथील निघालेला ओढा सध्या पूर्णपणे बुजला आहे. या ओढ्याचा प्रवास काळमवाडी, नेर्ले, येवलेवाडी, तांबवे असा आहे. हे पाणी बहे तीळगंगा नदीला मिळते. हा पाण्याचा प्रवास कित्येक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हे पाणी परिसरातील जमिनींमध्ये मुरते. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र क्षारपड बनले आहे. याच जमिनीच्या उपाययोजनेसाठी खासदार शेट्टी यांनी बहे येथे तातडीने बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह देण्यासाठीच शेट्टींची खेळी असल्याचे जाणवत होते.गुलाल तिकडं चांगभलं..!कृष्णा कारखान्यात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व महाडिक गटाचे मिळून १0 संचालक आहेत. या संचालकांना कृष्णा कारखान्यावर गेले की भाजपचा झेंडा नाचवावा लागतो. राष्ट्रवादीचे ८ संचालक आहेत, तर काँग्रेसचे जितेंद्र पाटील आणि महाडिक गटाचे गिरीश पाटील हेही वाळवा तालुक्यातीलच आहेत. त्यांनाही कृष्णा कारखाना व तालुक्यात वेगवेगळी भूमिका राबवावी लागते. आता स्वाभिमानीला राष्ट्रवादीने जवळ केल्याने त्यांची स्थिती ‘गुलाल तिकडं चांगभलं’, अशीच आहे.