शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:34 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे रयत क्रांतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून मंत्री खोत यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीला नमविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळेच इस्लामपूर शहरात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत बहुतांशी नेत्यांनी सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले होते, तर खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले आहे.दोनच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बहे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर बैठक घेतली. त्यावेळी तांबवे येथील राष्ट्रवादीचे माजी जि. प. उपाध्यक्ष व कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्यासह नेर्ले, तांबवे, काळमवाडी, बहे या परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्षारपड जमिनी पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत मंथन झाले. केंद्र शासनाच्या जलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून जमिनीत येणारे अतिरिक्त पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून बाहेर काढण्याची योजना अस्तित्वात आहे.यासाठी शेतकऱ्यांना ४0 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच केंद्र शासन ६0 टक्के निधी देणार आहे. ४0 टक्के शेतकºयांची रक्कम ही साखर कारखान्यांनी भरण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीची माहिती रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. त्याची माहिती तात्काळ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळे ‘ताकाला जाऊन मोगा का लपवायचा’ अशी मार्मिक टिपणी करुन खोत यांनी याला जादा महत्त्व दिले नाही.खेळी स्पष्ट : सदाभाऊंना शहकाळमवाडी येथील निघालेला ओढा सध्या पूर्णपणे बुजला आहे. या ओढ्याचा प्रवास काळमवाडी, नेर्ले, येवलेवाडी, तांबवे असा आहे. हे पाणी बहे तीळगंगा नदीला मिळते. हा पाण्याचा प्रवास कित्येक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हे पाणी परिसरातील जमिनींमध्ये मुरते. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र क्षारपड बनले आहे. याच जमिनीच्या उपाययोजनेसाठी खासदार शेट्टी यांनी बहे येथे तातडीने बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह देण्यासाठीच शेट्टींची खेळी असल्याचे जाणवत होते.गुलाल तिकडं चांगभलं..!कृष्णा कारखान्यात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व महाडिक गटाचे मिळून १0 संचालक आहेत. या संचालकांना कृष्णा कारखान्यावर गेले की भाजपचा झेंडा नाचवावा लागतो. राष्ट्रवादीचे ८ संचालक आहेत, तर काँग्रेसचे जितेंद्र पाटील आणि महाडिक गटाचे गिरीश पाटील हेही वाळवा तालुक्यातीलच आहेत. त्यांनाही कृष्णा कारखाना व तालुक्यात वेगवेगळी भूमिका राबवावी लागते. आता स्वाभिमानीला राष्ट्रवादीने जवळ केल्याने त्यांची स्थिती ‘गुलाल तिकडं चांगभलं’, अशीच आहे.