शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पेठमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बंधाऱ्यास प्रारंभ

By admin | Updated: June 21, 2016 01:22 IST

तिळगंगाचे पुनरूज्जीवन : लोकसहभागातून राज्यातील पहिलाच उपक्रम

पेठ : पेठ येथील लोकसहभागाची चळवळ पाहून आम्ही प्रभावित झालो. त्यामुळेच राज्यात प्रथमच पेठ येथे नदीपात्रात टायर बंधाऱ्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. कौस्तुभ आमटे यांनी केले. टाकाऊ वस्तूंपासून बंधारा कामास सोमवारी प्रारंभ झाला.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम चार महिन्यांपासून सुरु आहे. या नदीमध्ये टायर बंधाऱ्याची अर्थात ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ निर्मिती केली जाणार आहे. या कामाचा प्रारंभ सोमवारी आमटे यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपाली सरनोबत, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य प्रकाश पाटील उपस्थित होते. आमटे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखत दुष्काळावर मात करण्यासाठी टायर व टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचा उपक्रम आम्ही आमच्या भागात केला आहे. आम्ही अशाप्रकारे ८ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत आता पेठ येथे प्रथमच लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रजित देशमुख म्हणाले, सर्वांनीच सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. पुढील पिढीला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. पेठप्रमाणेच असे उपक्रम राज्यभर राबविल्यास दुष्काळाचा सामना यशस्वीपणे करता येईल.आमदार नाईक म्हणाले, शासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत आमच्या भागात अनेक कामे केली आहेत. पेठ येथील उपक्रम कौतुकास्पद आहे. सम्राट महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत, तर भाई संपतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. पंडित लोहार यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी राहुल गावडे, शांताराम देशमाने, जगन्नाथ माळी, बजरंग कदम, कृष्णात पाटील, डी. जी. खोत, सूर्यकांत शिंदे, हमणंत कदम, संदीप पाटील, बी. जी. पाटील, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)वाया जाणारे पाणी शेतीसजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात २५0 कि. मी. इतकी जलसंधारणाची कामे केली असून टेंभू योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही ओढे, नाल्याला पावसाचे जाणारे पाणी अडवून ते पाणी शेतीला कसे देता येईल, याचाही अभ्यास केला आहे. हा उपक्रम लवकरच राबविला जाईल.