शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पेठमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बंधाऱ्यास प्रारंभ

By admin | Updated: June 21, 2016 01:22 IST

तिळगंगाचे पुनरूज्जीवन : लोकसहभागातून राज्यातील पहिलाच उपक्रम

पेठ : पेठ येथील लोकसहभागाची चळवळ पाहून आम्ही प्रभावित झालो. त्यामुळेच राज्यात प्रथमच पेठ येथे नदीपात्रात टायर बंधाऱ्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. कौस्तुभ आमटे यांनी केले. टाकाऊ वस्तूंपासून बंधारा कामास सोमवारी प्रारंभ झाला.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम चार महिन्यांपासून सुरु आहे. या नदीमध्ये टायर बंधाऱ्याची अर्थात ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ निर्मिती केली जाणार आहे. या कामाचा प्रारंभ सोमवारी आमटे यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपाली सरनोबत, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य प्रकाश पाटील उपस्थित होते. आमटे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखत दुष्काळावर मात करण्यासाठी टायर व टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचा उपक्रम आम्ही आमच्या भागात केला आहे. आम्ही अशाप्रकारे ८ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत आता पेठ येथे प्रथमच लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रजित देशमुख म्हणाले, सर्वांनीच सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. पुढील पिढीला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. पेठप्रमाणेच असे उपक्रम राज्यभर राबविल्यास दुष्काळाचा सामना यशस्वीपणे करता येईल.आमदार नाईक म्हणाले, शासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत आमच्या भागात अनेक कामे केली आहेत. पेठ येथील उपक्रम कौतुकास्पद आहे. सम्राट महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत, तर भाई संपतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. पंडित लोहार यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी राहुल गावडे, शांताराम देशमाने, जगन्नाथ माळी, बजरंग कदम, कृष्णात पाटील, डी. जी. खोत, सूर्यकांत शिंदे, हमणंत कदम, संदीप पाटील, बी. जी. पाटील, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)वाया जाणारे पाणी शेतीसजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात २५0 कि. मी. इतकी जलसंधारणाची कामे केली असून टेंभू योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही ओढे, नाल्याला पावसाचे जाणारे पाणी अडवून ते पाणी शेतीला कसे देता येईल, याचाही अभ्यास केला आहे. हा उपक्रम लवकरच राबविला जाईल.