शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पेठमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बंधाऱ्यास प्रारंभ

By admin | Updated: June 21, 2016 01:22 IST

तिळगंगाचे पुनरूज्जीवन : लोकसहभागातून राज्यातील पहिलाच उपक्रम

पेठ : पेठ येथील लोकसहभागाची चळवळ पाहून आम्ही प्रभावित झालो. त्यामुळेच राज्यात प्रथमच पेठ येथे नदीपात्रात टायर बंधाऱ्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. कौस्तुभ आमटे यांनी केले. टाकाऊ वस्तूंपासून बंधारा कामास सोमवारी प्रारंभ झाला.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम चार महिन्यांपासून सुरु आहे. या नदीमध्ये टायर बंधाऱ्याची अर्थात ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ निर्मिती केली जाणार आहे. या कामाचा प्रारंभ सोमवारी आमटे यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपाली सरनोबत, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य प्रकाश पाटील उपस्थित होते. आमटे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखत दुष्काळावर मात करण्यासाठी टायर व टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचा उपक्रम आम्ही आमच्या भागात केला आहे. आम्ही अशाप्रकारे ८ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत आता पेठ येथे प्रथमच लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रजित देशमुख म्हणाले, सर्वांनीच सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. पुढील पिढीला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. पेठप्रमाणेच असे उपक्रम राज्यभर राबविल्यास दुष्काळाचा सामना यशस्वीपणे करता येईल.आमदार नाईक म्हणाले, शासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत आमच्या भागात अनेक कामे केली आहेत. पेठ येथील उपक्रम कौतुकास्पद आहे. सम्राट महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत, तर भाई संपतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. पंडित लोहार यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी राहुल गावडे, शांताराम देशमाने, जगन्नाथ माळी, बजरंग कदम, कृष्णात पाटील, डी. जी. खोत, सूर्यकांत शिंदे, हमणंत कदम, संदीप पाटील, बी. जी. पाटील, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)वाया जाणारे पाणी शेतीसजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात २५0 कि. मी. इतकी जलसंधारणाची कामे केली असून टेंभू योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही ओढे, नाल्याला पावसाचे जाणारे पाणी अडवून ते पाणी शेतीला कसे देता येईल, याचाही अभ्यास केला आहे. हा उपक्रम लवकरच राबविला जाईल.