शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

चारा छावण्या तात्काळ सुरू करा

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

जि. प. जलव्यवस्थापन समिती बैठक : दुष्काळावर गंभीर चर्चा

सांगली : जिल्ह्यातील जतबरोबरच आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व भागामध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. तेथे शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत शुक्रवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समिती बैठक झाली. जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी राज्य शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला. यावर होर्तीकर यांनी, शासनाकडे तसा ठराव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी, बनपुरी आणि खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात त्वरित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. दोन कोटींच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याचा निर्णय झाला. यामध्ये बहुतांशी बंधारे जत तालुक्यातीलच आहेत. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, सुवर्णा नांगरे, सूर्यकांत मुटेकर, सुवर्णा पिंगळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रोजगार हमीच्या कामाची चौकशी होणारखानापूर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द कंत्राटी तांत्रिक अधिकारी सूर्यकांत सरगर यांनीच केला आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या २०१२ पासूनच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड्. मुळीक यांनी केली होती. त्यानुसार रेश्माक्का होर्तीकर यांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले आहे.