शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या तात्काळ सुरू करा

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

जि. प. जलव्यवस्थापन समिती बैठक : दुष्काळावर गंभीर चर्चा

सांगली : जिल्ह्यातील जतबरोबरच आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व भागामध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. तेथे शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत शुक्रवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समिती बैठक झाली. जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी राज्य शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला. यावर होर्तीकर यांनी, शासनाकडे तसा ठराव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी, बनपुरी आणि खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात त्वरित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. दोन कोटींच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याचा निर्णय झाला. यामध्ये बहुतांशी बंधारे जत तालुक्यातीलच आहेत. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, सुवर्णा नांगरे, सूर्यकांत मुटेकर, सुवर्णा पिंगळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रोजगार हमीच्या कामाची चौकशी होणारखानापूर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द कंत्राटी तांत्रिक अधिकारी सूर्यकांत सरगर यांनीच केला आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या २०१२ पासूनच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड्. मुळीक यांनी केली होती. त्यानुसार रेश्माक्का होर्तीकर यांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले आहे.