शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’ सुरूव्हावा

By admin | Updated: January 4, 2016 00:29 IST

‘कुमुदा’कडून आशा : कामगार, शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न

नंदकुमार ढेरे --चंदगड -गेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) दौलत साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने बेळगावच्या कुमुदा शुगर्सने टाकलेले पाऊल शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी निश्चितच आशादायी असून यंदा कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे; परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक नरसिंगराव पाटील यांनी या प्रक्रियेविरोधात आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र, कुमुदा शुगर्सने येत्या १ फेब्रुवारीला कारखाना सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने ‘दौलत’ पुन्हा सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.गेले चार गळीत हंगाम बंद असलेला, कारखान्यांवर विविध वित्तीय संस्थांचे असलेले डोंगराएवढे कर्ज यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्हा बँकेने तब्बल आठवेळा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्याकरिता निविदा प्रसिद्ध केल्या, पण त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.दौलत कारखाना बंद असल्याने अन्य साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. कामगार देशोधडीला लागले आहेत. दौलत कोणी चालवायला घेईल ही आशादेखील जवळपास मावळली असताना कुमुदा शुगर्सने कारखाना चालवायला घेण्याची तयारी दर्शविल्याने शेतकऱ्यांसह कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू झालाच पाहिजे या भूमिकेवर शेतकरी, कामगार ठाम आहेत.परंतु कुमुदा शुगर्सच्या निर्णयाला कारखान्याचे माजी अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांनी विरोध दर्शवत आपण न्यायालयात जाणार असल्याची भाषा केली आहे. त्यामुळे कदाचित कारखाना सुरू होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील पाटील यांनी अशी धमकावणीची भाषा वापरली होती. कारखान्यावरील मोठ्या कर्जाचा बोजा शीरावर घ्यायचा आणि त्याला पुन्हा राजकीय विरोध यामुळे बाहेरील कंपन्या कारखाना चालवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वी पहायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या प्रयत्नांमुळे बेळगावच्या कुमुदा शुगर्सने २९ वर्षांच्या कराराने कारखाना चालवण्याचे धाडस दाखवले हे स्वागतार्ह आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल. नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेवावादौलत कारखाना बंद असल्यामुळे नेतेमंडळींचे फारसे नुकसान झाले नसले तरी शेतकरी व कामगार मात्र पुरते अडचणीत आले आहेत. आजवर कारखान्याचा वापर राजकारणासाठी झाल्याने ‘दौलत’ची ही स्थिती निर्माण झाली आहे. आतातरी राजकीय नेत्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवावा, अन्यथा चंदगडचा शेतकरी, कामगार संबंधितांना कधीच माफ करणार नाही.चाचणी हंगामासाठी ऊस देऊकुमुदा शुगर्सने २९ वर्षांच्या कराराने दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी निविदेसोबत भरावयाची १ कोटी रूपयांची अनामत रक्कमही जिल्हा बँकेकडे भरली आहे. कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेताना १० कोटी, १५ कोटींची बँक गॅरंटी, मार्चअखेर १० कोटी व उर्वरित कर्ज समान हप्त्यात फेडण्याची तयारी दर्शविली आहे. प्रत्यक्ष ताबा घेण्यास आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर मशिनरींची दुरूस्ती करून कारखाना सुरू करण्यास मार्च उजाडेल. तोपर्यंत यंदाचा ऊस हंगाम संपत आलेला असेल. मात्र, कुमुदा शुगर्सने यंदा दौलतची चाचणी घेतल्यास त्यासाठी लागणारा किमान ५० हजार टन ऊस चंदगडचे शेतकरी उपलब्ध करून देण्यास तयार आहेत.