शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

इस्लामपूर, शिराळ्यातून मिरजेपर्यंत बसफेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

इस्लामपूर : वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील जनतेच्या सोयीसाठी या दोन्ही आगारातून सांगलीपर्यंत जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या मिरजेपर्यंत कराव्यात, अशी ...

इस्लामपूर : वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील जनतेच्या सोयीसाठी या दोन्ही आगारातून सांगलीपर्यंत जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या मिरजेपर्यंत कराव्यात, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना केली आहे.

या दोन्ही तालुक्यातील जनतेचा मिरजेशी सातत्याने संपर्क येत असतो. जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रामबाग, पोलीस मुख्यालय, प्रशासकीय इमारत, शैक्षणिक महाविद्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल अशा विविध ठिकाणी त्यांना जावे लागत असते. तसेच शासकीय रुग्णालय, मिरजेतील शासकीय रुग्णालय आणि मिशन रुग्णालय येथे वैद्यकीय कारणासाठी जाण्याची गरज भासते.

सांगलीतून मिरजकडे जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणी केली जाते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला बसतो. अशा गंभीर स्वरुपाच्या आलेल्या तक्रारीची दखल घेत जयंत पाटील यांनी सांगलीपासून मिरजेपर्यंतच्या सर्व थांब्यांवर ही सेवा देण्याचे पत्र विभाग नियंत्रकांना दिले आहे.