शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न झाला; पण तो सर्वच कामगार संघटनांनी हाणून पाडला. बस स्थानकावरच लागलेली खासगी प्रवासी वाहनेही कर्मचाºयांनी बस स्थानकातून बाहेर काढली.दिवाळीमध्ये एसटी बसेसना प्रचंड गर्दी असते. या कालावधित एसटीकडून हंगामी भाडेवाढही केली जाते. त्यामुळे तुलनेने दिवाळीतील कमाई जास्त असते. पण विविध मागण्यांसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व आगारांचे मिळून दिवसाला ७० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न बुडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सांगलीच्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांची सकाळी गर्दी झाली होती. मात्र एसटी कर्मचाºयांचा संप असल्याचे लक्षात येताच प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले. राज्य शासनाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी खासगी प्रवासी वाहने थेट बस स्थानकातच आणली. याची माहिती एसटी कामगारांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळावरून बस स्थानकाकडे मोर्चा वळविला. खासगी प्रवासी वाहतुकीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ही वाहतूक रोखली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºयांनी गाड्या बाहेर काढल्या.दुपारी दोनपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्यकर्ते चालक व वाहकाला विनवणी करून एक बस सांगली स्थानकावर घेऊन आले. प्रवासी नसल्यामुळे ही बस थांबूनच होती. तेवढ्यात अन्य सर्व कामगार संघटनांचे कर्मचारी बसजवळ आले व त्यांनी चालकाच्या हातात बांगड्या दिल्या. यावरू वादावादी झाली. ‘तुमच्याकडे पैसे नसतील, तर आम्ही भीक मागून देतो’, असे म्हणून कर्मचाºयांनी पैसे गोळा केले. परंतु, वाहक पैसे न घेता निघून गेला. वाद वाढू नये म्हणून चालक व वाहकाने बस पुन्हा आगारात लावली. त्यानंतर दिवसभर बसेसची जिल्ह्यातील सर्व वाहतूक बंद होती. जिल्ह्यातील एकूण १७७६ बसेसपैकी सकाळी केवळ तासगाव, आटपाडी, कोल्हापूर मार्गावर १२ बसेस धावल्या. त्यानंतर दिवसभर वाहतूक ठप्प होती.संप मोडीत काढण्याचा प्रयत्न नको : बिराज साळुंखेराज्य सरकार, प्रशासन आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून कर्मचाºयांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. तरीही काही मंडळींनी मंगळवारी संप मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्मचाºयांनी चोख उत्तर दिले आहे. याचा विचार करून शासनाने कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला.