शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न झाला; पण तो सर्वच कामगार संघटनांनी हाणून पाडला. बस स्थानकावरच लागलेली खासगी प्रवासी वाहनेही कर्मचाºयांनी बस स्थानकातून बाहेर काढली.दिवाळीमध्ये एसटी बसेसना प्रचंड गर्दी असते. या कालावधित एसटीकडून हंगामी भाडेवाढही केली जाते. त्यामुळे तुलनेने दिवाळीतील कमाई जास्त असते. पण विविध मागण्यांसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व आगारांचे मिळून दिवसाला ७० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न बुडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सांगलीच्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांची सकाळी गर्दी झाली होती. मात्र एसटी कर्मचाºयांचा संप असल्याचे लक्षात येताच प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले. राज्य शासनाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी खासगी प्रवासी वाहने थेट बस स्थानकातच आणली. याची माहिती एसटी कामगारांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळावरून बस स्थानकाकडे मोर्चा वळविला. खासगी प्रवासी वाहतुकीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ही वाहतूक रोखली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºयांनी गाड्या बाहेर काढल्या.दुपारी दोनपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्यकर्ते चालक व वाहकाला विनवणी करून एक बस सांगली स्थानकावर घेऊन आले. प्रवासी नसल्यामुळे ही बस थांबूनच होती. तेवढ्यात अन्य सर्व कामगार संघटनांचे कर्मचारी बसजवळ आले व त्यांनी चालकाच्या हातात बांगड्या दिल्या. यावरू वादावादी झाली. ‘तुमच्याकडे पैसे नसतील, तर आम्ही भीक मागून देतो’, असे म्हणून कर्मचाºयांनी पैसे गोळा केले. परंतु, वाहक पैसे न घेता निघून गेला. वाद वाढू नये म्हणून चालक व वाहकाने बस पुन्हा आगारात लावली. त्यानंतर दिवसभर बसेसची जिल्ह्यातील सर्व वाहतूक बंद होती. जिल्ह्यातील एकूण १७७६ बसेसपैकी सकाळी केवळ तासगाव, आटपाडी, कोल्हापूर मार्गावर १२ बसेस धावल्या. त्यानंतर दिवसभर वाहतूक ठप्प होती.संप मोडीत काढण्याचा प्रयत्न नको : बिराज साळुंखेराज्य सरकार, प्रशासन आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून कर्मचाºयांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. तरीही काही मंडळींनी मंगळवारी संप मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्मचाºयांनी चोख उत्तर दिले आहे. याचा विचार करून शासनाने कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला.