शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धर्तीवर एसटी सेवा शासनानेच चालवावी, एसटीला १२०० कोटींचा तोटा -- हनुमंत ताटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:25 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा राज्य शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. शासनाकडून मदत मिळत नसतानाही, उत्पन्न मिळवून देऊन स्वत:चा खर्च भागविण्यात महामंडळाचा पुढाकार असतो. परंतु खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला १२०० कोटींचे नुकसान होत आहे

ठळक मुद्देअवैध प्रवासी वाहतूक बेकायदेशीर असल्यामुळे ती बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहे. तरीही

सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा राज्य शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. शासनाकडून मदत मिळत नसतानाही, उत्पन्न मिळवून देऊन स्वत:चा खर्च भागविण्यात महामंडळाचा पुढाकार असतो. परंतु खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला १२०० कोटींचे नुकसान होत आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. रेल्वे सेवेच्या धर्तीवर शासनानेच एसटी चालवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ते म्हणाले की, अवैध प्रवासी वाहतूक बेकायदेशीर असल्यामुळे ती बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहे. तरीही राज्यातअवैध प्रवासी वाहतूक राजरोस चालू आहे. शासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. चुकीच्या धोरणामुळेच एसटी सध्या तोट्यात आहे. एसटीला वर्षाला १२०० कोटींचे नुकसान होत आहे. डोंगराळ व दुर्गम भागातदेखील एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. यामुळेही ६०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. टप्पे वाहतूक ही महामंडळाची मक्तेदारी असतानाही, खासगी वाहतूकदार सर्रास टप्पे वाहतुकीचा वापर करीत आहेत. महामंडळ वर्षामध्ये प्रवासी कर, मोटार वाहन कर, टोल-टॅक्स, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर असे मिळून १०३८ कोटी एवढा कर शासनास भरते.

राज्य शासनात महामंडळाचे विलीनीकरण केल्यास हे प्रश्न मार्गी लागतील. परिवहनमंत्र्यांनी २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या वेतन करारासाठी ४८४९ कोटीची एकतर्फी घोषणा केली आहे. त्यानुसार कामगारांना किमान ३२ ते ४८ टक्के पगारवाढ मिळेल, असे जाहीर केले होते. परंतु प्रशासनाने त्या रकमेचे वाटप करताना दिलेल्या सूत्रानुसार कामगारांना पूर्ण रकमेचे वाटप होत नाही. याच्या निषेधार्थ कामगारांनी मध्यंतरी काम बंद आंदोलन केलेहोते.जाहीर करण्यात आलेल्या रकमेचे पूर्ण वाटप होत नसल्यामुळेच संघटनेने अद्याप वेतन करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याचेही ताटे यांनी सांगितले.सातवा वेतन आयोग लागू कराकामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी आहे. यामुळेच ४८४९ कोटीची रक्कम व सातव्या वेतन आयोगाचे २.५७ चे सूत्र कामगारांना लागू करण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांना करावी लागली. सुधारित प्रस्तावानुसार वेतनवाढ न झाल्यास संघर्ष अटळ आहे. शासनाने महामंडळाच्या विविध सेवांचे अप्रत्यक्षरित्या खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याला विरोध असल्याचेही ताटे यांनी सांगितले.