शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या कृत्रिम टंचाईमुळे सूतगिरण्या अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

विटा : वर्षअखेरीच्या चार महिन्यांत सूतगिरण्यांना लागणारा कापूस काही ठराविक बड्या व्यापाऱ्यांच्या गोदामात बंद असल्याने कापूस साठ्याची व दराची ...

विटा : वर्षअखेरीच्या चार महिन्यांत सूतगिरण्यांना लागणारा कापूस काही ठराविक बड्या व्यापाऱ्यांच्या गोदामात बंद असल्याने कापूस साठ्याची व दराची होणारी मक्तेदारी निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने दरात भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी, कापसाअभावी सूतगिरण्या अडचणीत आल्या असून, संपूर्ण वस्त्रोद्योग साखळी वेठीस धरली जात आहे.

जागतिकीकरणानंतर मुक्त व्यापार प्रणालीमुळे कापसाचा वायदेबाजार अर्थात कमोडिटी मार्केटमध्ये समावेश झाल्याने कापसाच्या दरावर प्रत्येक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे परिणाम होत आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग साखळीला वारंवार तेजी-मंदीच्या खेळाला तोंड द्यावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. जून ते सप्टेंबर व ऑक्टोबरच्या शेवटच्या चार ते पाच महिन्यांत देशभरातील सूतगिरण्यांना लागणारा कापूस ठराविक बडे कापूस व्यापारी व शून्य व्याजदराचे प्रचंड भांडवल असलेल्या परदेशी कंपन्यांच्या गोदामात बंद असतो. हे ठराविक बडे व्यापारी साखळी करून बाजारपेठेत कापसाची कृत्रिम टंचाई करून दरात भरमसाठ वाढ करून प्रचंड नफेखोरी करीत असल्याचा अनुभव सूतगिरणी व्यवस्थापनाला येत आहे.

देशातील संपूर्ण सूतगिरणी उद्योगास महिन्याला सुमारे २६ लाख, तर वर्षाला तीन ते सव्वातीन कोटी कापूस गाठी लागतात. या हिशोबाने येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सूतगिरण्यांना एक ते सव्वाकोटीच्या आसपास कापूस गाठी लागणार आहेत. त्यापैकी सरासरी महिनाभराचा २५ ते २६ लाख गाठींचा साठा सध्या सूतगिरण्यांकडे आहे.

त्यामुळे सूतगिरण्या अडचणीत आल्या असून, त्यावर अवलंबून असलेली संपूर्ण वस्त्रोद्योग साखळी संकटात सापडली आहे. कापसाच्या कृत्रिम टंचाईमुळे दरात मोठी वाढ झाल्याने यंत्रमाग लघु उद्योग कमालीच्या नुकसानीत सापडला आहे. या सर्व प्रकाराचा केंद्र व राज्य शासनाने अभ्यास करून कापूस साठेबाजीला व मक्तेदारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

चौकट

केंद्र शासनाच्या कॉटन काॅर्पोरेशनने शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेला कापूस साठा न करता ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर देशातील सूतगिरण्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या कृत्रिम टंचाई व मक्तेदारीस नक्कीच आळा बसू शकतो, असे मत विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.