शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आजी-माजी आमदारांची विट्यात ‘साखर पेरणी’

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

युवा नेत्यांचीही फिल्डिंग : नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी; शहरातील प्रमुख पॉकेटस्वर नेत्यांचे लक्ष

दिलीप मोहिते-- विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आखाडा अजून वर्षभर पुढे असतानाच, शहरातील प्रमुख पॉकेटस्वर राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास वर्षाहून अधिक काळ पालिकेची सत्ता हातात ठेवणारे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सत्ता शाबूत ठेवण्यासाठी, तर शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन, प्रसंगी नाराजांना व कार्यकर्त्यांना बंगल्यावर बोलावून ‘साखर पेरणी’ सुरू केली आहे. त्यातच विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक विशाल पाटील यांच्यासह विरोधी शिवसेनेचे अमोल बाबर व पंचायत समितीचे उपसभापती सुहास बाबर यांनीही फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. खानापूर विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता विटा पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. नोव्हेंबर २०१६ ला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीत विटा शहराने आ. बाबर यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. माजी आमदार पाटील यांना शहरात मिळालेले कमी मताधिक्य संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते, कार्यकर्ते आपण कोठे चुकलो, कसे चुकलो व यापुढील काळात काय करायला पाहिजे, याचे आत्मचिंतन करून त्यापध्दतीने बदल घडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ पालिकेची सत्ता एकहाती ठेवणाऱ्या माजी आमदार पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कमी मतांचे कारण शोधून काढून नागरिकांशी संवाद वाढविला असून, नाराजांना एकत्रित करून त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी प्रभागवार बैठका घेण्याचे काम सुरू झाले आहे.दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आ. बाबर यांनीही विटेकरांशी जवळीक साधत पालिकेत त्यांची अडलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. पालिका निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कार्यकाल बाकी असला तरी, दोन्ही गटातील आजी-माजी आमदारांनी आतापासूनच शहरात ‘साखर पेरणी’ सुरू केल्याने, तो सर्वसामान्यांत चर्चेचा विषय ठरला आहे.अडचणी सोडविण्याचा प्रयत्नआजी-माजी आमदारांच्या सुपुत्रांनीही शहरात संपर्क वाढविला आहे. विशेषत: आ. बाबर यांचे पुत्र अमोल व पंचायत समितीचे उपसभापती सुहास यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या अडचणी समजावून घेण्याचे काम हाती घेतले आहे. विट्यातील शिवसेना भवनमध्ये लोकांना बोलावून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष वैभव पाटील व नगरसेवक विशाल पाटील यांनीही नागरिकांसह कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. निवडणुकीत या युवा नेत्यांचे काम लक्षवेधी ठरणार आहे.