शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीनचा फटका

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

मिरज पश्चिम भागातील चित्र : बियाणांमुळे नुकसान

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज  - मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी, तुंग येथील सुमारे ९०० शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीन बियाणाचा फटका बसला आहे.यावर्षी सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कंपन्यांनी आकर्षक बॅगेत निकृष्ट सोयाबीन भरून त्याची भरमसाट दराने विक्री केली. मात्र या सोयाबीनची उगवण क्षमता कमी असून वाढ कमी आहे. या निकृष्ट बियाणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीच्या प्रतिनिधींकडे, विक्रेत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे तीन हजार एकर सोयाबीन आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने रात्री-अपरात्री जागरण करून पाणी देऊन वारंवार औषध फवारणी केली. परिसरात एका कंपनीने ६०० बॅगा सोयाबीन बियाणे भरमसाट दराने विकले आहे. या सोयाबीनची वाढ तोकडी आहे. इतर सोयाबीनच्या तुलनेत आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्पादनाच्या मानाने यावर्षी या कंपनीच्या पिकांची वाढ अत्यंत तोकडी आहे. या सोयाबीनची ८-१० इंचच वाढ दिसते. इतर पिके २४ इंचापेक्षा जादा वाढली आहेत. या सोयाबीनला वाढ नसल्याने शेंगांची संख्या अत्यंत कमी आहे.कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना ही वाढ खुंटलेली बाब, लवकर परिपक्वता, शेंगांची कमी संख्या दाखविली असता, त्यांनी भेट टाळून थातूरमातूर उत्तरे दिली. कोणाकडे तक्रार करणार असाल तर करा, आमची कंपनी मोठी आहे, अशी उडवाउडवी केली जात आहे. या कंपनीचे सुमारे १२०० एकर क्षेत्र आहे. उत्पादन घटल्यामुळे लाखोंचे आर्थिक नुकसान होणार आहे.याप्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. काही शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.