शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 17, 2017 00:20 IST

जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : खरीप हंगामातील पिकांसाठी यंदा कायम दुष्काळी जत तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये प्रथमच मृग, आर्द्रा पुनर्वसू नक्षत्रात पर्जन्यराजाने भलतीच कृपा केली आहे. आतापर्यंत २०९.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तालुक्यात खरिपाची ३० हजार १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सध्या कोळपणीची कामे सुरू आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटणार आहे. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती हंगामातील खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. खरीप हंगामातील बाजरी पीक प्रमुख पीक आहे. तालुक्यामध्ये खरीप हंगाम क्षेत्र ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. बाजरी पीक ३२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रात घेतले जाते. मका ४ हजार ६२५ हेक्टर, मूग १२२५ हेक्टर, उडीद १४२० हेक्टर, सूर्यफूल १२८५ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने ८ जूनपासून चांगली हजेरी लावली होती. माडग्याळ, सोन्याळ, व्हसपेठ, सिद्धनाथ परिसराचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडला. जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्याने शेतकऱ्यांनी झटपट पेरणी केली. ५ वर्षांमध्ये प्रथमच खरिपाच्या ३० हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जवळपास ४८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवली होती. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पिके उन्हं धरू लागली होती. वाढ खुंटली होती.दडी दिलेल्या पावसाने ९ जुलैला देवनाळ, मेंढीगिरी, मुचंडी, दरीबडची, सिद्धनाथ परिसरामध्ये चांगली हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पुनर्वसू नक्षत्र आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. १९ जुलैपासून पुष्य (म्हातारा पाऊस) नक्षत्र सुरू होणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. ही दोन्ही नक्षत्रे पावसास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.ओढे, तलाव कोरडेच; टॅँकरही सुरू..!खरीप हंगामासाठी पाऊस समाधानकारक झाला आहे. पण कोणत्याही ओढ्याला पाणी आले नाही. तलावांनाही पुरेशा प्रमाणात पाणी आलेले नाही. पूर्व भागातील तलाव कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. ऐन पावसाळ्यातही ६८ गावांना, ५७९ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १ लाख ५५ हजार ९१८ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून आहे. त्यामुळे तालुका आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पीक पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये) पीक क्षेत्र बाजरी२०४२०उडीद४२००हुलगा१०२मका१६४०तूर१५८०भुईमूग४७०मूग९१०मटकी६८०सूर्यफूल१४५