शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 17, 2017 00:20 IST

जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : खरीप हंगामातील पिकांसाठी यंदा कायम दुष्काळी जत तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये प्रथमच मृग, आर्द्रा पुनर्वसू नक्षत्रात पर्जन्यराजाने भलतीच कृपा केली आहे. आतापर्यंत २०९.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तालुक्यात खरिपाची ३० हजार १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सध्या कोळपणीची कामे सुरू आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटणार आहे. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती हंगामातील खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. खरीप हंगामातील बाजरी पीक प्रमुख पीक आहे. तालुक्यामध्ये खरीप हंगाम क्षेत्र ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. बाजरी पीक ३२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रात घेतले जाते. मका ४ हजार ६२५ हेक्टर, मूग १२२५ हेक्टर, उडीद १४२० हेक्टर, सूर्यफूल १२८५ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने ८ जूनपासून चांगली हजेरी लावली होती. माडग्याळ, सोन्याळ, व्हसपेठ, सिद्धनाथ परिसराचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडला. जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्याने शेतकऱ्यांनी झटपट पेरणी केली. ५ वर्षांमध्ये प्रथमच खरिपाच्या ३० हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जवळपास ४८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवली होती. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पिके उन्हं धरू लागली होती. वाढ खुंटली होती.दडी दिलेल्या पावसाने ९ जुलैला देवनाळ, मेंढीगिरी, मुचंडी, दरीबडची, सिद्धनाथ परिसरामध्ये चांगली हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पुनर्वसू नक्षत्र आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. १९ जुलैपासून पुष्य (म्हातारा पाऊस) नक्षत्र सुरू होणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. ही दोन्ही नक्षत्रे पावसास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.ओढे, तलाव कोरडेच; टॅँकरही सुरू..!खरीप हंगामासाठी पाऊस समाधानकारक झाला आहे. पण कोणत्याही ओढ्याला पाणी आले नाही. तलावांनाही पुरेशा प्रमाणात पाणी आलेले नाही. पूर्व भागातील तलाव कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. ऐन पावसाळ्यातही ६८ गावांना, ५७९ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १ लाख ५५ हजार ९१८ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून आहे. त्यामुळे तालुका आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पीक पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये) पीक क्षेत्र बाजरी२०४२०उडीद४२००हुलगा१०२मका१६४०तूर१५८०भुईमूग४७०मूग९१०मटकी६८०सूर्यफूल१४५