इस्लामपूर येथे नूतन तहसीलदार प्रदीप उबाळे यांचे स्वागत एम. डी. चौधरी यांनी केले. यावेळी संजय पाटील, मोहन पाटील, संतोष कदम, शेखर गायकवाड उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा-वारणा नदीकाठच्या महापूरग्रस्त गावातील कुटुंबांना शासनाचे सानुग्रह अनुदान लवकर मिळेल, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
राष्ट्रीय मानव हक्क अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय प्रवक्ते संतोष कदम, जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी मोहन पाटील यांच्या शिष्टमंडळाने उबाळे यांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. उबाळे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असे स्पष्ट केले.
यावेळी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, सुुभाष पाटील, सुधीर रोकडे, शेखर गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा रोहिणी कदम, सुनीता बिरणगे, उज्ज्वला सपकाळ उपस्थित होत्या.