शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पूर ओसरताच नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल. पाणी ओसरताच शेती, घरांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा, असे आदेश पालकमंंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूरस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, २०१९ वेळी महापुराच्या वेळी झालेल्या पावसापेक्षा आताच्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसाने आता उसंत दिली असली, तरी विसर्गामुळे फुगवटा कायम आहे. भविष्यात असाच पाऊस आला, तर त्यासाठी अत्यंत नेटके नियोजन हवे.

पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने औषध फवारणी करून घ्यावी. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरित दुरूस्ती करून करून घ्यावी. पुरात अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यासाठी आराखडे तयार केल्यास भविष्यात पुराचा त्रास होणार नाही.

दुधगाव, शिगाव भागात पाणी पसरले असून, वारणेतून होणारा २८ हजार क्युसेक्स विसर्ग १६ हजारांवर करण्यात आला आहे. सांगलीतील पाणी ८ ते १० तासांत ओसरेल. पाणी ओसरताच यंत्रणांनी करावयाच्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार, प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

चौकट

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुरामुळे स्थलांतरित कराव्या लागलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन निवारा केंद्रातील सोईसुविधांवर प्रशासनाने लक्ष द्यावे.