शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पूर ओसरताच नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल. पाणी ओसरताच शेती, घरांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा, असे आदेश पालकमंंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूरस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, २०१९ वेळी महापुराच्या वेळी झालेल्या पावसापेक्षा आताच्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसाने आता उसंत दिली असली, तरी विसर्गामुळे फुगवटा कायम आहे. भविष्यात असाच पाऊस आला, तर त्यासाठी अत्यंत नेटके नियोजन हवे.

पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने औषध फवारणी करून घ्यावी. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरित दुरूस्ती करून करून घ्यावी. पुरात अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यासाठी आराखडे तयार केल्यास भविष्यात पुराचा त्रास होणार नाही.

दुधगाव, शिगाव भागात पाणी पसरले असून, वारणेतून होणारा २८ हजार क्युसेक्स विसर्ग १६ हजारांवर करण्यात आला आहे. सांगलीतील पाणी ८ ते १० तासांत ओसरेल. पाणी ओसरताच यंत्रणांनी करावयाच्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार, प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

चौकट

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुरामुळे स्थलांतरित कराव्या लागलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन निवारा केंद्रातील सोईसुविधांवर प्रशासनाने लक्ष द्यावे.