शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जत तालुक्याचे लवकरच विभाजन

By admin | Updated: October 28, 2015 00:01 IST

देवेंद्र फडणवीस : सिंचन योजनांसाठी मंजूर असलेले ३२ कोटी रुपये उपलब्ध करून देणार

जत : आघाडी शासनाच्या कालावधित काही ठिकाणी सोयीचे तालुके निर्माण झाले; परंतु जत तालुक्याचे विभाजन झाले नाही. राज्य शासनाने नवीन तालुके निर्माण करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये जत तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करण्यास प्रथमप्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बिरनाळ (ता. जत) येथे आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. म्हैसाळ योजनेचे काम युती शासनाच्या कालावधित सुरू झाले होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारीही आमचीच आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ३२ कोटी रुपये देण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी दिले आहे. नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत किंवा डिसेंबर पुरवणी अधिवेशनात यासंदर्भात राज्य शासन अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जर निर्णय झाला नाही, तर १५-१६ या आर्थिक वर्षात निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना राज्य शासनाने नव्यानेच तयार केली आहे. या योजनेत जत तालुक्याच्या पूर्व भागातील ७२ गावांचा समावेश करून त्यामध्ये नगाराटेक (जत) प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले खासदार संजय पाटील म्हणाले की, जत तालुक्यावर आजपर्यंत अन्याय झाला आहे. मदत करण्यापेक्षा आड येण्याचेच काम विरोधकांनी केले आहे. युतीच्या काळात येथील अनुशेष भरून निघेल. आमदार विलासराव जगताप म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जत तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करणे व इतर विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन आपण स्वत: निवडणूक प्रचार सभेत दिले आहे. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, डॉ. रवींद्र आरळी, शिवाजीराव ताड, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)