शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जत तालुक्याचे लवकरच विभाजन

By admin | Updated: October 28, 2015 00:01 IST

देवेंद्र फडणवीस : सिंचन योजनांसाठी मंजूर असलेले ३२ कोटी रुपये उपलब्ध करून देणार

जत : आघाडी शासनाच्या कालावधित काही ठिकाणी सोयीचे तालुके निर्माण झाले; परंतु जत तालुक्याचे विभाजन झाले नाही. राज्य शासनाने नवीन तालुके निर्माण करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये जत तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करण्यास प्रथमप्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बिरनाळ (ता. जत) येथे आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. म्हैसाळ योजनेचे काम युती शासनाच्या कालावधित सुरू झाले होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारीही आमचीच आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ३२ कोटी रुपये देण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी दिले आहे. नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत किंवा डिसेंबर पुरवणी अधिवेशनात यासंदर्भात राज्य शासन अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जर निर्णय झाला नाही, तर १५-१६ या आर्थिक वर्षात निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना राज्य शासनाने नव्यानेच तयार केली आहे. या योजनेत जत तालुक्याच्या पूर्व भागातील ७२ गावांचा समावेश करून त्यामध्ये नगाराटेक (जत) प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले खासदार संजय पाटील म्हणाले की, जत तालुक्यावर आजपर्यंत अन्याय झाला आहे. मदत करण्यापेक्षा आड येण्याचेच काम विरोधकांनी केले आहे. युतीच्या काळात येथील अनुशेष भरून निघेल. आमदार विलासराव जगताप म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जत तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करणे व इतर विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन आपण स्वत: निवडणूक प्रचार सभेत दिले आहे. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, डॉ. रवींद्र आरळी, शिवाजीराव ताड, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)