शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट, दादागिरीमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहराच्या क्षमतेपेक्षा रिक्षाचे जादा परवाने दिल्याने सर्वच रस्त्यांवर त्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहराच्या क्षमतेपेक्षा रिक्षाचे जादा परवाने दिल्याने सर्वच रस्त्यांवर त्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका क्षेत्रात रिक्षांच्या उच्छादामुळे पादचारी आणि छोटे वाहनचालक हैराण झाले आहेत. बहुतांश बसथांबे रिक्षाचालकांनी अनधिकृतरीत्या हायजॅक केले आहेत, शिवाय अनेक ठिकाणी बेकायदा थांबेही निर्माण केले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थापन धाब्यावर बसविले जात आहे. सांगली-मिरज रस्त्यावर नियम तोडून बेफाम धावणाऱ्या रिक्षा अनेकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. अधिकाधिक प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत भरधाव पळवल्या जात आहेत. वाट्टेल तिथे अचानक ब्रेक मारून थांबवल्या जातात. हात किंवा सिग्नल न दाखताच अचानक वळवल्या जातात. भर गर्दीत घुसवून वाहतुकीचा फज्जा उडवला जातो. एखाद्या सजग नागरिकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर चक्क त्याच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडतात.

बॉक्स

रिक्षाचालकांच्या दादागिरीने नागरिक हैराण

सिटी पोस्टासमोर बेकायदा थांबा

सांगलीत सिटी पोस्टासमोर रिक्षाचालकांनी बेकायदा थांबा निर्माण केला आहे. वाहतुकीला अडथळा करत रिक्षा थांबवल्या जातात. विशेष म्हणजे, बेकायदा थांब्याला लागूनच वाहतूक पोलिसांचा पॉईन्टही आहे.

बसस्थानकासमोर दादागिरी

बसस्थानकासमोरही रांगेतील रिक्षाचालकांवर शिरजोरी करत बेकायदा थांबा निर्माण केला आहे. मिरजेला प्रवासी नेणाऱ्या रिक्षाचालकांची येेथे दिवसभर दादागिरी सुरू असते.

सिव्हिल रुग्णालयासमोर मनमानी

शासकीय रुग्णालयासमोर वाहतुकीची कोंडी करत रिक्षा थांबवल्या जातात. रस्ता अडवल्याने अनेकदा जीवघेणे अपघातही झाले आहेत. या सर्व ठिकाणी पोलिसांनी कारवाई करणे टाळले आहे.

बॉक्स

वाट्टेल तसे भाडे

- शहरांतर्गत शहरी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याचा गैरफायदा रिक्षाचालक उठवत आहेत.

- सांगली-मिरज प्रवासासाठी चक्क ५० रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात आहे.

- विस्तारित भागात जाण्यासाठी तर रिक्षाचालक सांगेल तेच भाडे द्यावे लागते.

बॉक्स

पोलीस, आरटीओ कारवाई करणार कधी?

गणेशोत्सवात खरेदी करून परतताना शिवाजी मंडई ते संजयनगरसाठी १२५ रुपये भाडे रिक्षाचालकाने घेतले. रिक्षाचालकांच्या मनमानीवर पोलीस कारवाई कधी करणार, असा प्रश्न पडतो.

- रोहिणी लांडगे, संजयनगर, सांगली

सांगली-मिरज रस्त्यावर जीव मुठी धरूनच दुचाकी चालवावी लागते. एखादी रिक्षा कधी आडवी येऊन अपघात घडवेल याचा नेम नसतो.

- नरेश साने, सांगली

कोट

नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर सतत कारवाया सुरू असतात. अनधिकृत थांब्यावरील रिक्षांचे फोटो काढून ऑनलाईन दंड केला जातो. राजवाडा चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून रिक्षा थांबवल्या जातात. त्यांच्यावर यापूर्वीही कारवाया केल्या आहेत. सध्या गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामुळे कारवाया थोड्या कमी झाल्या आहेत.

- प्रज्ञा देशमुख, सहायक निरिक्षक, वाहतूक शाखा