शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

काही जातींना राजकीय दबावापोटीच आरक्षण

By admin | Updated: January 8, 2015 23:26 IST

दादा इदाते : पोटासाठी भटकणाऱ्या समाजाला स्थिर करण्याची गरज...

दापोली : लढवय्या जाती-जमातीची देश स्वतंत्र झाल्यावर सुटका तर झालीच, परंतु समाजाचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकास झाला नसून, आजही हा समाज देशातील विविध गावात भटकंती करुन जीवन जगत आहे. आजपर्यंत काही जातींना राजकीय दबावापोटीच आरक्षण दिले जात असल्याची टीका राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग अध्यक्ष दादा इदाते यांनी केली, ते ‘लोकमत’शी बोलत होते.देशात २२ कोटीपेक्षा अधिक संख्या असणारा भटका विमुक्त समाज वर्षानुवर्षे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. केवळ पोटासाठी भटकंती करणाऱ्या समाजाला कुठेतरी स्थिर करण्याची गरज आहे. त्यांना जातीचे दाखले, घरे, रोजगार देण्याची गरज आहे. या समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. परंतु या देशात चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिले जात आहे. आरक्षणात काही जातींचा राजकीय ‘व्होट बँक’ म्हणून, तर काही जातीचा राजकीय दबावापोटी समावेश केला जात आहे. त्यामुळे आरक्षण हे राजकीय परीलाभाचे बनले आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिल्यामुळे खरोखर ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्या समाजावर अन्याय होत आहे. आरक्षणाकडे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे. आरक्षणाकडे राजकारण म्हणून पाहिले जाते. आरक्षण हे अविकसीत समाजासाठी असायला हवे. शुद्ध समाजकारण म्हणून आरक्षणाकडे पाहावे, असे ते म्हणाले.राज्य मागासवर्ग आयोगाचे काही निकष ठरलेले आहेत. या निकषाचा विचार न करताच लोकसंख्येच्या आधारावर राजकीय दबावापोटी आरक्षण दिले जाते. यशवंतराव चव्हाण यांनी भटक्या विमुक्त जातीला ४ टक्के आरक्षण दिले होते. त्यानंतर वंजारी, धनगर अशा काही जातींचा समावेश करुन ४ टक्क्यांवरुन ११ टक्के भटक्या विमुक्त जाती - जमातीसाठी आरक्षण करण्यात आले. अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली. भटक्या विमुक्त जातीत काही जातीचा अजून, समावेश करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.भटक्या विमुक्त दुर्लक्षित समाज घटकाला एकत्र करुन त्यांचे प्रश्न सोडविणार. भटक्या विमुक्त जाती - जमातीचे प्रश्न समजून घेऊन सरकारला अहवाल सादर करणार, त्यासाठी आपण कोणत्याही जातीवर अन्याय होऊ देणार नाही. दुर्लक्षित भटक्या समाजाचे प्रश्न सोडविणे आपले आद्य कर्तव्य आहे. युतीच्या काळात इदाते समितीच्या माध्यमातून भटक्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. मात्र, अजूनही समाधानकारक काम झाले नाही. देशातील प्रत्येक भटक्या समाजाला मूलभूत गरजा मिळून त्यांचे जीवनमान सुधारणा नाही तोपर्यंत या देशातील खऱ्या हकदाराला न्याय मिळणार नाही. (प्रतिनिधी)