शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

चांदोलीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा

By admin | Updated: December 8, 2015 00:36 IST

जयंत पाटील : जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसनाबाबत बैठक

सांगली : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही कायम असून, त्यांचे पुनर्वसन होत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केली. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यावेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, चांदोली अभयारण्यासाठी जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून शासकीय लाभापासून वंचित आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनीचे हस्तांतरणही अजून झालेले नसल्याने, प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे संकलन सध्या सुरु असून त्यात त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करुन भूमिहीनांचे संकलन करणे गरजेचे आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये काही खातेदारांना भूखंड वाटप करण्याचे काम अजून बाकी असून त्यासाठी सर्व्हे करुन वाढीव भूखंड मंजूर करण्यात यावा. आष्टा येथील ११० एकर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून गेली चार वर्षे याबाबत कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाने हा प्रश्न निकाली काढावा. शासनाच्या गायरान जमिनी व कवठेपिरान येथील पांजरपोळ जमिनीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, यासह कें द्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली नाही, तर त्यास पाच लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले असले तरी, त्याचा लाभ होत नसल्याने, ही रक्कम देण्याची कार्यवाही करण्यासह इतर मागण्यांचे निवेदनही यावेळी किसन मलप, पांडुरंग पाटील, तानाजी सावंत, धावजी अनुसे, शंकर सावंत, गणपती पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)