शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा

By admin | Updated: December 8, 2015 00:36 IST

जयंत पाटील : जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसनाबाबत बैठक

सांगली : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही कायम असून, त्यांचे पुनर्वसन होत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केली. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यावेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, चांदोली अभयारण्यासाठी जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून शासकीय लाभापासून वंचित आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनीचे हस्तांतरणही अजून झालेले नसल्याने, प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे संकलन सध्या सुरु असून त्यात त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करुन भूमिहीनांचे संकलन करणे गरजेचे आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये काही खातेदारांना भूखंड वाटप करण्याचे काम अजून बाकी असून त्यासाठी सर्व्हे करुन वाढीव भूखंड मंजूर करण्यात यावा. आष्टा येथील ११० एकर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून गेली चार वर्षे याबाबत कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाने हा प्रश्न निकाली काढावा. शासनाच्या गायरान जमिनी व कवठेपिरान येथील पांजरपोळ जमिनीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, यासह कें द्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली नाही, तर त्यास पाच लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले असले तरी, त्याचा लाभ होत नसल्याने, ही रक्कम देण्याची कार्यवाही करण्यासह इतर मागण्यांचे निवेदनही यावेळी किसन मलप, पांडुरंग पाटील, तानाजी सावंत, धावजी अनुसे, शंकर सावंत, गणपती पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)