शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

एलबीटीचा प्रश्न सोडवू - सुधीर गाडगीळ यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:49 IST

राज्य शासनाने एलबीटी रद्द करून तीन वर्षे झाली; पण अद्याप थकबाकीचा प्रश्न कायम आहे. येत्या दोन महिन्यांत एलबीटीचा प्रश्न संपूर्ण निकाली काढला जाईल. तोपर्यंत थकबाकी वसुलीस स्थगिती कायम राहील, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी

ठळक मुद्देसांगलीत व्यापारी असोसिएशनच्यावतीने सत्कार

सांगली : राज्य शासनाने एलबीटी रद्द करून तीन वर्षे झाली; पण अद्याप थकबाकीचा प्रश्न कायम आहे. येत्या दोन महिन्यांत एलबीटीचा प्रश्न संपूर्ण निकाली काढला जाईल. तोपर्यंत थकबाकी वसुलीस स्थगिती कायम राहील, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी दिली.

महापालिकेत सत्तांतरानंतर व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने आ. गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा उपस्थित होते. शहा यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटीचा प्रश्न, तसेच महापालिकेच्यावतीने विविध प्रकारे होणाºया त्रासाबद्दल गाºहाणे मांडले.

गाडगीळ म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे यापुढे व्यापाºयांना कोणताही त्रास होणार नाही. महापालिकेशी संबंधित व्यापाºयांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच व्यापारी-प्रशासन समिती स्थापन केली जाईल. काही चुकीच्या धोरणांमुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारपेठेला उर्जितावस्था आणणे गरजेचे होते. त्यासाठी भाजप महापालिकेच्या माध्यमातून तसेच शासन पातळीवर प्रयत्न करेल. त्यासाठी माझा पुढाकार असेल.

एलबीटीप्रश्नी ते म्हणाले की, एलबीटी रद्द होऊन तीन वर्षे झाली तरी, थकबाकीमुळे या प्रश्नाचे भिजत घोंगडे आहे. हा प्रश्न दोन महिन्यात निकाली काढू. महापालिकेच्यावतीने लोकप्रतिनिधी म्हणून मला आणि असोसिएशनला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही व्यापाºयावर कारवाई केली जाणार नाही. यापुढे व्यापारी बांधवांना रस्त्यावर उतरून कोणतेही आंदोलन करावे लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी मुकेश चावला, दीपेन देसाई, संजय शहा, सुशांत शहा, सुरेश पटेल, सुदर्शन माने यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.विकासात सहकार्य करा : दीपक शिंदेदीपक शिंदे म्हणाले, व्यापाºयांनीही शहराच्या विकास कामात सहकार्याची भूमिका ठेवावी. शहर विकासाची जबाबदारी समजून सर्व कर वेळेत भरून सहकार्य करावे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते निश्चित सोडविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील. व्यापाºयांना त्रास देण्याचा आमचा कोणताही प्रयत्न असणार नाही.