शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडवा: रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:25 IST

कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल ...

कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल रक्ताची माणसे तयार झाली, तरच या देशात सामाजिक परिवर्तन होईल, असे मत लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.हिंगणगाव येथे रविवारी चौथे लोकजागर साहित्य संमेलन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शासनाच्या धोरणावर, जातीयवादावर निशाणा साधला. ते म्हणाले, पुतळ्यावर तीन हजार कोटी घालण्यापेक्षा पाणी, वीज, बेरोजगारीसाठी ३० हजार कोटी घाला, देश प्रगतिपथावर जाईल. तसेच तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. तरच बेरोजगारी कमी होईल. जोपर्यंत दाखल्यावरची जात जात नाही, तोपर्यंत जातनिर्मूलन होणार नाही, असेही फुटाणे म्हणाले.स्वागताध्यक्ष डॉ. भीमराव कोळेकर म्हणाले, आजच्या तरुणाईने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनामुळे समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ बनतो. तसेच नवनिर्मितीसुद्धा वाचनामुळेच होते.संमेलनाचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, ग्रामीण भागातून होणारी साहित्य संमेलने ही विचारमंथन करणारी संमेलने असून, परिवर्तनाची वैचारिक दिशा यामधूनच ठरते. ही साहित्य संमेलने समाजाचा आरसा आहेत.दरम्यान, सकाळी गावातून ढोलताशांच्या गजरात, वाजत-गाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाची सुरुवात तुळशीच्या रोपाला मान्यवरांच्याहस्ते पाणी घालून करण्यात आली. संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अभिजित राऊत यांचा आम्ही हिंगणगावकर परिवारामार्फत मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रात उद्घाटनानंतर डॉ. भारती पाटील यांचे ‘सखी’ या विषयावर व्याख्यान पार पडले.दुपारच्या सत्रात कवी गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यामध्ये कवी रमजान मुल्ला, ज्योती बने, हणमंत शिंदे, गोपाळ पाटील, सुरेखा कांबळे, दयासागर बने, मनीषा पाटील यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कथाकार जयवंत आवटी यांचे ‘सरपंच’ या विषयावर कथाकथन झाले.यावेळी नवनाथ गोरे, भीमराव धळूबुळू, तहसीलदार शिल्पा ठोकडे, अजितराव घोरपडे, जयसिंगराव शेंडगे, गजानन कोठावळे, आशाताई पाटील, गीतांजली माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन पार पाडण्यासाठी आम्ही हिंगणगावकर ग्रुपचे कॅप्टन वसंत शेजाळ, प्रा. अनिल पाटील, प्रा. प्रकाश घड्याळे, सचिन चौगुले, सुनील पाटील, नाना शेजाळ, गौसमहंमद मुजावर यांनी परिश्रम घेतले.‘मी टू’ काही नवीन नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राफेल घोटाळ्यावरून देशात राळ उठली आहे. मोदींच्या सांगण्यावरून मीडियाने राफेल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे चर्चेचे गुºहाळ बाहेर काढल्याची बोचरी टीकाही रामदास फुटाणे यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.