शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पुतळ्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडवा: रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:25 IST

कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल ...

कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल रक्ताची माणसे तयार झाली, तरच या देशात सामाजिक परिवर्तन होईल, असे मत लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.हिंगणगाव येथे रविवारी चौथे लोकजागर साहित्य संमेलन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शासनाच्या धोरणावर, जातीयवादावर निशाणा साधला. ते म्हणाले, पुतळ्यावर तीन हजार कोटी घालण्यापेक्षा पाणी, वीज, बेरोजगारीसाठी ३० हजार कोटी घाला, देश प्रगतिपथावर जाईल. तसेच तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. तरच बेरोजगारी कमी होईल. जोपर्यंत दाखल्यावरची जात जात नाही, तोपर्यंत जातनिर्मूलन होणार नाही, असेही फुटाणे म्हणाले.स्वागताध्यक्ष डॉ. भीमराव कोळेकर म्हणाले, आजच्या तरुणाईने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनामुळे समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ बनतो. तसेच नवनिर्मितीसुद्धा वाचनामुळेच होते.संमेलनाचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, ग्रामीण भागातून होणारी साहित्य संमेलने ही विचारमंथन करणारी संमेलने असून, परिवर्तनाची वैचारिक दिशा यामधूनच ठरते. ही साहित्य संमेलने समाजाचा आरसा आहेत.दरम्यान, सकाळी गावातून ढोलताशांच्या गजरात, वाजत-गाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाची सुरुवात तुळशीच्या रोपाला मान्यवरांच्याहस्ते पाणी घालून करण्यात आली. संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अभिजित राऊत यांचा आम्ही हिंगणगावकर परिवारामार्फत मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रात उद्घाटनानंतर डॉ. भारती पाटील यांचे ‘सखी’ या विषयावर व्याख्यान पार पडले.दुपारच्या सत्रात कवी गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यामध्ये कवी रमजान मुल्ला, ज्योती बने, हणमंत शिंदे, गोपाळ पाटील, सुरेखा कांबळे, दयासागर बने, मनीषा पाटील यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कथाकार जयवंत आवटी यांचे ‘सरपंच’ या विषयावर कथाकथन झाले.यावेळी नवनाथ गोरे, भीमराव धळूबुळू, तहसीलदार शिल्पा ठोकडे, अजितराव घोरपडे, जयसिंगराव शेंडगे, गजानन कोठावळे, आशाताई पाटील, गीतांजली माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन पार पाडण्यासाठी आम्ही हिंगणगावकर ग्रुपचे कॅप्टन वसंत शेजाळ, प्रा. अनिल पाटील, प्रा. प्रकाश घड्याळे, सचिन चौगुले, सुनील पाटील, नाना शेजाळ, गौसमहंमद मुजावर यांनी परिश्रम घेतले.‘मी टू’ काही नवीन नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राफेल घोटाळ्यावरून देशात राळ उठली आहे. मोदींच्या सांगण्यावरून मीडियाने राफेल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे चर्चेचे गुºहाळ बाहेर काढल्याची बोचरी टीकाही रामदास फुटाणे यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.