शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सौरऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा ...

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा अखंडित आठ तास देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील गेल्या ३० वर्षांतील अंधार संपुष्टात येऊन त्यांच्या जीवनात सौरऊर्जेचा प्रकाश पडणार आहे.

शेतकऱ्यांना ३० वर्षांत कृषिपंपांना अखंडित दिवसा वीज मिळतच नाही. अपवादात्मक दिवस वीज मिळते, तीही अखंडित नाही. बहुतांश वेळा रात्रीचीच वीज मिळते. रात्रीच्या भारनियनामुळे सर्पदंश, हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने सौरऊर्जेचा चांगला मार्ग स्वीकारला आहे. या ऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. ते म्हणजे, महावितरण कंपनी ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध होईल. तेथे चार ते पाच मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प करणार आहे. येथे तयार वीज जवळच्या वीज उपकेंद्रात एकत्रित करून त्या गावातील शेतीपंपाला दिवसा अखंडित आठ तास देणार आहे. जनरेशन कंपनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून जत तालुक्यातील उमदी, उटगी, सोनलगी, वाळेखिंडी, बोर्गी खुर्द, दरीकुणूर; खानापूर तालुक्यातील नागेवाडी, मिरज तालुक्यातील आरगची निवड केली आहे. या ठिकाणी दोन ते सहा मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. महावितरणनेही केंद्र शासनाच्या योजनेतून आटपाडी तालुक्यातील करगणी, माडगुळे, झरे, जत तालुक्यातील कोसारी, डफळापूर, जिरग्याळ, बनाळी, आसंगी, असंगी तुर्क, कोंत्यावबोबलाद, कंठी, बिर्नाळ, खानापूर तालुक्यातील आळसंद, पारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, म्हैसाळ एम, वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी, किल्ले मच्छिंद्रगड, लवाणमाची, आदी २० ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केली आहेत. एक प्रकल्प उभारणीसाठी पाच ते दहा एकर जागेची गरज आहे. एक टक्काही प्रदूषण नसणारा आणि कमी खर्चातील हा यशस्वी प्रकल्प आहे.

चाैकट

कसबे डिग्रजचा प्रकल्प यशस्वी

महावितरणने कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे साडेचार मेगावॅटचा सौरऊर्जेचा प्रकल्प तयार केला आहे. महावितरणाला सव्वादोन ते अडीच रुपये प्रतियुनिटने वीज मिळत आहे. अन्य प्रकल्पांतून सध्या महावितरण साडेचार ते पावणेपाच रुपये प्रतियुनिटने वीज खरेदी करत आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज तुंग (ता. मिरज) येथील उपकेंद्राला जोडली आहे. या केंद्रातील कृषी पंपांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध होत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.