शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

समाज एकत्र नाही, ही देशाची शोकांतिका

By admin | Updated: January 18, 2016 23:46 IST

रामदास फुटाणे : शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेस प्रारंभ

कोकरुड : सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी सामान्य लोकांना जाती-जातीच्या राजकारणात गुंतविल्यामुळे आजचा समाज एकत्र येत नाही, ही भारताची फार मोठी शोकांतिका आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, ज्येष्ठ कवी व वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले. शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेत ‘भारत कधी... कधी... माझा देश...’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका तहसीलदार वैशाली सरनोबत होत्या. रामदास फुटाणे म्हणाले की, जोपर्यंत गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. श्रीमंतांची व मध्यमवर्गीयांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषा घरात घुसत आहे. इंग्रजी जगाची संपर्क भाषा आहे. ती भाषा आली पाहिजे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना इंग्रजी आले पाहिजे. परंतु आजी, आजोबा, आई, अण्णा, काका, मामा, बापू हे जिव्हाळ्याचे शब्द घरामध्ये टिकले पाहिजेत. आपल्याला ज्ञानोबांचा, तुकारामांचा, शिवबांचा महाराष्ट्र घेऊन परदेशामध्ये जायचे आहे, अशी मानसिकता आजच्या युवकांमध्ये असली पाहिजे. देशामध्ये जी अर्थव्यवस्था चालली आहे, त्यामध्ये मोठी तफावत आहे. ती कोणासाठी आहे हेच समजत नाही. काळ बदलला तरी वर्षानुवर्षे शेतकरी मात्र चार-पाच हजारावरच राबत आहे. यामध्ये दिवसातून दोन तास कष्ट घेऊन लाखो रुपयांचे काम करणाऱ्यांमध्ये कधी तरी संघर्ष होणार, हे निश्चित आहे. यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, सिनेअभिनेते विलास रकटे, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सतीश पाटील, महेश पाटील, उत्तम निकम, विजयराव यादव, अजिंक्य कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)