शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

समाज एकत्र नाही, ही देशाची शोकांतिका

By admin | Updated: January 18, 2016 23:46 IST

रामदास फुटाणे : शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेस प्रारंभ

कोकरुड : सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी सामान्य लोकांना जाती-जातीच्या राजकारणात गुंतविल्यामुळे आजचा समाज एकत्र येत नाही, ही भारताची फार मोठी शोकांतिका आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, ज्येष्ठ कवी व वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले. शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेत ‘भारत कधी... कधी... माझा देश...’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका तहसीलदार वैशाली सरनोबत होत्या. रामदास फुटाणे म्हणाले की, जोपर्यंत गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. श्रीमंतांची व मध्यमवर्गीयांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषा घरात घुसत आहे. इंग्रजी जगाची संपर्क भाषा आहे. ती भाषा आली पाहिजे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना इंग्रजी आले पाहिजे. परंतु आजी, आजोबा, आई, अण्णा, काका, मामा, बापू हे जिव्हाळ्याचे शब्द घरामध्ये टिकले पाहिजेत. आपल्याला ज्ञानोबांचा, तुकारामांचा, शिवबांचा महाराष्ट्र घेऊन परदेशामध्ये जायचे आहे, अशी मानसिकता आजच्या युवकांमध्ये असली पाहिजे. देशामध्ये जी अर्थव्यवस्था चालली आहे, त्यामध्ये मोठी तफावत आहे. ती कोणासाठी आहे हेच समजत नाही. काळ बदलला तरी वर्षानुवर्षे शेतकरी मात्र चार-पाच हजारावरच राबत आहे. यामध्ये दिवसातून दोन तास कष्ट घेऊन लाखो रुपयांचे काम करणाऱ्यांमध्ये कधी तरी संघर्ष होणार, हे निश्चित आहे. यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, सिनेअभिनेते विलास रकटे, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सतीश पाटील, महेश पाटील, उत्तम निकम, विजयराव यादव, अजिंक्य कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)