शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

क्रांतिसिंहांच्या विचारांची आज समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

विटा : आजची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जो कोणी व्यवस्थेच्या विरोधात बोलेल, त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. डॉ. ...

विटा : आजची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जो कोणी व्यवस्थेच्या विरोधात बोलेल, त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बोलण्याचा हक्क दिला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामान्य माणसाला आवाज दिला आहे. ही त्यांची देणगी आहे. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांची खरी गरज आहे, असे मत विटा येथील बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे यांनी व्यक्त केले.

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाच्या मोफत वाचनालयातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीरांगणा श्रीमती हौसाताई पाटील, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, संपतराव पवार, ‘रयत’चे विभागीय अध्यक्ष माधवराव मोहिते, अ‍ॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार उपस्थित होते.

प्रा. डॉ. शिंदे यांनी क्रांतिसिंहांच्या जीवनावर एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम करणारे डॉ. इनामदार, डॉ. हुलवान, डॉ. कु. सकटे यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रा. संजय ठिगळे, प्रा. विलासराव पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, प्रा. पांडुरंग शितोळे, यशवंतराव महाडिक, राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत, मारूतीराव शिरतोडे, शिवाजीराव शितोळे आदी उपस्थित होते. इंद्रजित पाटील यांनी आभार मानले.

फोटो - ०७१२२०२०-विटा-हणमंतवडिये : कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये येथे क्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, संपतराव पवार, माधवराव मोहिते, प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे, प्रा. नवनाथ शिंदे उपस्थित होते.