शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘सोशल मीडिया’वर चोरांच्या अफवांचा बाजार!

By admin | Updated: August 4, 2015 23:37 IST

पोलीस हैराण : जिल्ह्यात तीन हजार परप्रांतीयांची घुसखोरी झाल्याची चर्चा; गावोगावी गस्त सुरूच

सचिन लाड- सांगली -बिहार, मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून सुमारे तीन हजार परप्रांतीयांनी चोऱ्या करण्यासाठी सांगली जिल्ह्यात शिरकाव केल्याची अफवा ‘सोशल मीडिया’वरून पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचे वर्णन, त्यांच्याकडील हत्यारांची छायाचित्रेही प्रसारित केली जात आहेत. चोरांना पकडण्यासाठी अनेक दिवसांपासून गावोगावी गस्त सुरू आहे, पण गस्त घालणाऱ्यांना चोरांचे अद्याप दर्शन झालेले नाही. या अफवांमुळे पोलीस त्रस्त आहेत.चोरटे गावात घुसल्याची चर्चा वाळवा, शिराळा तालुक्यातून सुरू झाली. तेथे गावकऱ्यांची गस्त सुरू झाली. मात्र इस्लामपुरात दोन दिवसांपूर्वी गस्त घालणारे तरुणच चोर निघाले. मग गावकऱ्यांनी आता विश्वास कोणावर ठेवायचा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात गावोगावी गस्त सुरू आहे. पण ग्रामस्थांना एकही चोर सापडलेला नाही. चोर असल्याच्या संशयावरून विनाकारण काहीजणांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयित चोरांकडे पोलिसांनी चौकशी केली, मात्र ते रात्री कामावरून येणारे किंवा परगावहून आलेले असल्याचे समजले. जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या गावकऱ्यांची रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत गस्त सुरू आहे. त्यांच्या जोडीला पोलीसही रात्रभर जागत आहेत. ‘चोर आलेऽऽ आलेऽऽ...’, म्हणून गावकरी दंगा करतात. चोरांच्या दिशेने पळत जातात. परंतु तेथे कोणीच नसते. ‘अंधारात पळून गेले’, असा सूर काढून गावकरी गप्प बसत आहेत.ग्रामीण भागातील चोर व गस्तीचे लोण आता शहरापर्यंत आले आहे. गेल्या पंधरवड्यात सांगली शहरात लूटमारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये पकडलेले लुटारू सांगलीतील निघाले आहेत. गुरुवारी रात्री हरिपूर, कवठेपिरान व कवलापूर या गावात चोर आल्याची अफवा पसरली. पाठलाग करूनही चोर सापडले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसही जी माहिती मिळेल, त्यानुसार गावोगावी जाऊन भेट देत आहेत. गावकऱ्यांनी गस्त घालताना दंगा करू नये, त्यांना पकडायचे असेल, तर नियोजनबद्ध आणि शांततेत गस्त घालण्याची गरज आहे. गस्त सुरू असताना काहीजणांच्या घरावर दगड पडतातच कसे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर चोरांचे वर्णन व त्यांच्याकडे असलेले छायाचित्र प्रसारित केले जात आहे. मित्रांनो, सावधान!सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, विट्यात दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांनी कबूल केले आहे की, आम्ही एक-दोन नसून, तीन हजार आहोत... मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून ते आले आहेत. तीन ते चार वर्षांच्या मुलांना ते पळवून नेत आहेत. आपल्या गावात शंकास्पद व्यक्ती वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. गाफील राहू नका. सर्वांना नम्र विनंती की, आपले मोबाईल चार्जिंग करून त्यावर पुरेसा बॅलन्स ठेवावा. जेणेकरून चोर आले तर, एकमेकांच्या मदतीसाठी संपर्क साधता येईल. चोर गावातील विजेचे दिवे बंद करतात. ते दिवसभर पाहणी करून जातात. लहान मुलांवर लक्ष ठेवा. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. हसण्यावारी नेऊ नका...