शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

समाजशील, कर्तव्यदक्ष अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

१४ नोव्हेंबर १९६६ रोजी रावसाहेबांचा जन्म मिरज तालुक्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरान या गावात शामराव कोरे म्हणजेच कोळी ...

१४ नोव्हेंबर १९६६ रोजी रावसाहेबांचा जन्म मिरज तालुक्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरान या गावात शामराव कोरे म्हणजेच कोळी गुरुजी आणि लक्ष्मीबाई यांच्यापोटी झाला. बालपणापासूनच ते जिद्दी, खेळकर आणि परिश्रम घेणारे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कवठेपिरान जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सांगलीतील आरवाडे हायस्कूल येथे झाले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण केले. ४ जानेवारी १९८५ रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी असलेले ज्येष्ठ बंधू उत्तमराव कोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वत:च्या हुशारीने ते जलसंपदा विभागात अनुरेखक पदावर रुजू झाले. प्रामाणिकपणे जबाबदारी पेलणाऱ्या रावसाहेबांनी पुढे सहायक आरेखक, आरेखक, प्रमुख आरेखक अशी पदोन्नती मिळवली. जलसंपदा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे ते अध्यक्ष होते.

सन २००३ मध्ये जलसंपदा विभागातील बरीच पदे रद्द केली. तेव्हा लढवय्या बाणा असणाऱ्या रावसाहेब कोरे यांनी सरकार बरोबर संघर्ष करून हजारो सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिला. लोकांच्या नोकऱ्या वाचविल्या. त्याचवेळी रावसाहेबांचे प्रमुख आरेखक पदही रद्दबातल ठरविण्यात आले आणि ३० ऑक्टोबर २००३ रोजी त्यांचे समावेशन राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकपदी करण्यात आले. रावसाहेबांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. अवैध व्यावसायिकांचा कर्दनकाळ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. शेकडो ठिकाणी छापे टाकून त्यांनी गावठी दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. असे धडाकेबाज, ध्येयवादी अबकारी अधिकारी रावसाहेब कोरे म्हणजे सुपरहिरोच होते.

राज्य सरकारने आणि विभागाने त्यांचा वेळोवेळी सन्मानपत्रे आणि बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. गुन्हेगारांना शिक्षा लावत असताना ती माणसं आहेत, हे रावसाहेब कोरे कधी विसरले नाहीत. म्हणूनच त्यांनी कायदेशीर नव्या अस्थापना सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करून अनेक उद्योजक तयार केले.

रावसाहेब कोरे यांनी सोलापूर व कोल्हापूर विभागात आपली कारकीर्द गाजविली होती. तरीही मध्यंतरी एक वर्षभर उत्पादन शुल्क विभागातून पुन्हा जलसंपदा विभागाकडे जबदरस्तीने त्यांना पाठविण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केला होता. प्रामाणिक सेवा करणाऱ्या व शासनाकडून अनेक मानपत्रे व बक्षिसांनी गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर अशी वेळ येते. परंतु, या सगळ्याला त्यांनी वरिष्ठांचा आदर राखत न्यायीक मार्गाने अत्यंत धीरोदात्तपणे तोंड दिले.

ते पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. शेवटी त्यांची बदली नागपूर विभागात झाली. आपल्याला लोकसेवेचे काम करायचे आहे, ही त्यांची भावना असल्यामुळे कुठेही जाण्याची त्यांची तयारी होती. बदलीनंतर ते दुय्यम निरीक्षक पदावर नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले. काही काळातच त्यांची निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. नागपूर विभागातही त्यांनी आपली कर्तव्यकुशलता दाखवून दिली. ६ सप्टेंबर २०१९ रोजी रावसाहेबांना राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदी बढती मिळाली. तेव्हा विभागातील सर्वांनीच जल्लोष केला होता.

राज्यातील कोळी समाज संघटनेला त्यांचे नेहमीच सहकार्य असायचे. आपल्या समाजातील तरुणांनी उद्योजक झाले पाहिजे व्यवसाय, नोकरी केली पाहिजे. पण बेरोजगार युवक राहू नये असा रावसाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोजगार व उद्योग प्रशिक्षिण शिबिरे घेतली.

कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. आपल्या चार बहिणी, त्यांची मुलं, भाऊ या सर्वांशी त्यांचा जिव्हाळा होता. साहेब कामात कितीही व्यस्त असले, तरी कुटुंबीयांची ते काळजी घ्यायचे. पत्नी सुनीता, मुलगा अरुण, सून दीपाली, मुलगी मिनाली, जावई गजानन सांगले, नातवंडे शर्वरी, कोमल, आत्मज, आरव या सर्वांवर ते जीवापाड प्रेम करायचे.

असे म्हणतात चांगली माणस देवाला फार प्रिय असतात. ६ सप्टेंबर २०२० रोजी रावसाहेबांचे अल्पश: आजाराने त्यांचे निधन झाले. कोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. साहेबांना अजून समाजासाठी खूप काही करायचे होते. पण नियतीपुढे सर्वांचेच हात थिटे पडतात. एक समाजशील, कुटुंबवत्सल, आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे रावसाहेब कोरे आज आपल्यात नाहीत ही वेदना मनाला सलत राहते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- मोहनराव कोळी