शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समाजशील, कर्तव्यदक्ष अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

१४ नोव्हेंबर १९६६ रोजी रावसाहेबांचा जन्म मिरज तालुक्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरान या गावात शामराव कोरे म्हणजेच कोळी ...

१४ नोव्हेंबर १९६६ रोजी रावसाहेबांचा जन्म मिरज तालुक्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरान या गावात शामराव कोरे म्हणजेच कोळी गुरुजी आणि लक्ष्मीबाई यांच्यापोटी झाला. बालपणापासूनच ते जिद्दी, खेळकर आणि परिश्रम घेणारे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कवठेपिरान जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सांगलीतील आरवाडे हायस्कूल येथे झाले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण केले. ४ जानेवारी १९८५ रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी असलेले ज्येष्ठ बंधू उत्तमराव कोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वत:च्या हुशारीने ते जलसंपदा विभागात अनुरेखक पदावर रुजू झाले. प्रामाणिकपणे जबाबदारी पेलणाऱ्या रावसाहेबांनी पुढे सहायक आरेखक, आरेखक, प्रमुख आरेखक अशी पदोन्नती मिळवली. जलसंपदा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे ते अध्यक्ष होते.

सन २००३ मध्ये जलसंपदा विभागातील बरीच पदे रद्द केली. तेव्हा लढवय्या बाणा असणाऱ्या रावसाहेब कोरे यांनी सरकार बरोबर संघर्ष करून हजारो सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिला. लोकांच्या नोकऱ्या वाचविल्या. त्याचवेळी रावसाहेबांचे प्रमुख आरेखक पदही रद्दबातल ठरविण्यात आले आणि ३० ऑक्टोबर २००३ रोजी त्यांचे समावेशन राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकपदी करण्यात आले. रावसाहेबांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. अवैध व्यावसायिकांचा कर्दनकाळ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. शेकडो ठिकाणी छापे टाकून त्यांनी गावठी दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. असे धडाकेबाज, ध्येयवादी अबकारी अधिकारी रावसाहेब कोरे म्हणजे सुपरहिरोच होते.

राज्य सरकारने आणि विभागाने त्यांचा वेळोवेळी सन्मानपत्रे आणि बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. गुन्हेगारांना शिक्षा लावत असताना ती माणसं आहेत, हे रावसाहेब कोरे कधी विसरले नाहीत. म्हणूनच त्यांनी कायदेशीर नव्या अस्थापना सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करून अनेक उद्योजक तयार केले.

रावसाहेब कोरे यांनी सोलापूर व कोल्हापूर विभागात आपली कारकीर्द गाजविली होती. तरीही मध्यंतरी एक वर्षभर उत्पादन शुल्क विभागातून पुन्हा जलसंपदा विभागाकडे जबदरस्तीने त्यांना पाठविण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केला होता. प्रामाणिक सेवा करणाऱ्या व शासनाकडून अनेक मानपत्रे व बक्षिसांनी गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर अशी वेळ येते. परंतु, या सगळ्याला त्यांनी वरिष्ठांचा आदर राखत न्यायीक मार्गाने अत्यंत धीरोदात्तपणे तोंड दिले.

ते पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. शेवटी त्यांची बदली नागपूर विभागात झाली. आपल्याला लोकसेवेचे काम करायचे आहे, ही त्यांची भावना असल्यामुळे कुठेही जाण्याची त्यांची तयारी होती. बदलीनंतर ते दुय्यम निरीक्षक पदावर नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले. काही काळातच त्यांची निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. नागपूर विभागातही त्यांनी आपली कर्तव्यकुशलता दाखवून दिली. ६ सप्टेंबर २०१९ रोजी रावसाहेबांना राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदी बढती मिळाली. तेव्हा विभागातील सर्वांनीच जल्लोष केला होता.

राज्यातील कोळी समाज संघटनेला त्यांचे नेहमीच सहकार्य असायचे. आपल्या समाजातील तरुणांनी उद्योजक झाले पाहिजे व्यवसाय, नोकरी केली पाहिजे. पण बेरोजगार युवक राहू नये असा रावसाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोजगार व उद्योग प्रशिक्षिण शिबिरे घेतली.

कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. आपल्या चार बहिणी, त्यांची मुलं, भाऊ या सर्वांशी त्यांचा जिव्हाळा होता. साहेब कामात कितीही व्यस्त असले, तरी कुटुंबीयांची ते काळजी घ्यायचे. पत्नी सुनीता, मुलगा अरुण, सून दीपाली, मुलगी मिनाली, जावई गजानन सांगले, नातवंडे शर्वरी, कोमल, आत्मज, आरव या सर्वांवर ते जीवापाड प्रेम करायचे.

असे म्हणतात चांगली माणस देवाला फार प्रिय असतात. ६ सप्टेंबर २०२० रोजी रावसाहेबांचे अल्पश: आजाराने त्यांचे निधन झाले. कोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. साहेबांना अजून समाजासाठी खूप काही करायचे होते. पण नियतीपुढे सर्वांचेच हात थिटे पडतात. एक समाजशील, कुटुंबवत्सल, आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे रावसाहेब कोरे आज आपल्यात नाहीत ही वेदना मनाला सलत राहते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- मोहनराव कोळी