शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांच्या धुराड्यातून संघर्षाचा धूर

By admin | Updated: July 7, 2015 23:32 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : वसंतदादा-राजारामबापू साखर कारखान्यांचा वाद पेटला

अविनाश कोळी - सांगली -राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नोंदली गेली असतानाच, या दोन्ही नेत्यांच्या नावाने उभारलेल्या साखर कारखान्यांचा संघर्षही आता नोंदला जाणार आहे. दोन्ही नेत्यांच्या वारसदारांनी एकमेकांच्या कारखान्यांना लक्ष्य केल्यामुळे राजकीय वादाचे धुराडे पेटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या वादाला तोंड फुटले आहे. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे धोरण बँकेतील सत्ताधारी गटाने घेतले आहे. या थकबाकीदारांमध्ये वसंतदादा साखर कारखान्याचाही समावेश आहे. वसंतदादा कारखान्यावरील कारवाई राजकीय हेतूने केली जात असल्याचे मत वसंतदादांचे नातू आणि कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे. वसंतदादा कारखान्यावरील कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाच, विशाल पाटील यांनी थेट राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्यावर हल्लाबोल केला. नियम डावलून राजारामबापू कारखान्याला कर्ज दिल्याचा व राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनविल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केल्यामुळे दोन्ही कारखान्यांचा वाद विकोपाला गेला आहे. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू यांच्या वारसदारांमधील राजकीय संबंधही पूर्वीपासून बिघडलेलेच आहेत. जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी आता जिल्हा बँकेच्या राजकारणात जुळवून घेतले असले तरी, हे मनोमीलन केवळ बँकेपुरतेच असल्याचे दोन्ही नेते सांगत आहेत. दुसरीकडे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांचे सूर कधीच जुळले नाहीत. विशाल पाटील यांचे मोठे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि जयंतरावांमध्येही यापूर्वी संघर्ष झाला आहे. राजकीय संघर्ष सुरू असताना कधी संस्थात्मक पातळीवर वाद निर्माण झाले नव्हते. जयंत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेवर टीका करून या संघर्षाला सुरुवात केली होती. तरीही दादा गटाने यापूर्वी कधी जयंतरावांच्या संस्थांवर हल्लाबोल केला नव्हता. विशाल पाटील यांनी याची सुरुवात जिल्हा बँकेच्या मैदानातून केली. राजारामबापू कारखान्याच्या चारही युनिटला स्वतंत्रपणे मर्यादेपेक्षा जादा कर्जपुरवठा कसा केला गेला, याची माहिती त्यांनी जाहीर केली. अर्थात या गोष्टींचा इन्कार बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी केला असला तरी, संस्थात्मक पातळीवरील युद्ध आता खऱ्याअर्थाने पेटले आहे. वसंतदादांच्या नावे स्थापन झालेल्या अनेक संस्था अडचणीत आल्या. सूतगिरणी, वसंत बझार यासारख्या संस्था बंद पडल्या तर वसंतदादा बँकेचा परवाना रद्द झाला. संस्थात्मक पातळीवर सांगलीत ही पडझड सुरू असतानाच इस्लामपूरमधील आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्था सुस्थितीत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक अधिक आक्रमक दिसत आहेत. जयंत पाटील यांनी वसंतदादा बँकेवर टीका करून या संस्थात्मक संघर्षाला सुरुवात केली होती. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असला तरी विशाल पाटील यांनी चिकाटी सोडलेली नाही. त्याचबरोबर त्यांनी राजकीयदृष्ट्याही आक्रमक भूमिका स्वीकारून राजारामबापू कारखान्यावर टीकास्त्र सोडले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी अनेक विषयांना विरोध केल्यामुळे या संघर्षाला अधिक धार आली आहे. कारवाईनंतर वाद चिघळणारवसंतदादा कारखान्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्हा बॅँकेतील दोन्ही गटांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. सध्या विरोधी सहा सदस्यांपैकी केवळ विशाल पाटीलच सत्ताधारी गटाविरोधात आक्रमक झाले आहे. दादा गट एकाकी!वसंतदादा गटातील विशाल पाटील व प्रतीक पाटील यांनी कदम गटाशी जुळवून घेतले असले, तरी प्रत्यक्षात बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही गटांत पुन्हा बिनसले आहे. जयंतरावांनी केलेल्या खेळीमुळे दादा गटाला धक्का बसला आहे. जयंतरावांनी थेट कदम गटालाच खेचण्यासाठी केलेली खेळी आता दादा गटाला अधिक अडचणीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दादा गट एकाकी पडण्याच्या मार्गावर आहे. अंतर्बाह्य संघर्षदादा गटाला सध्या अंतर्बाह्य संघर्ष करावा लागत आहे. मदन पाटील आणि विशाल पाटील वसंतदादांचे वारसदार असूनही सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. दादा गटातच वाद असल्यामुळे त्यांना प्रथम अंतर्गत आणि नंतर बाहेरच्या नेत्यांशी संघर्ष करावा लागत आहे.