शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

जलव्यवस्थापनासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा

By admin | Updated: March 5, 2017 23:30 IST

बर्ट सॅटिजिन : वालचंदमधील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

सांगली : हवामानातील बदल आणि जलव्यवस्थापन यांचे जागतिक संदर्भ बदलत चालले आहेत. त्यासाठी स्मार्ट दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे, असे मत नेदरलँड येथील तज्ज्ञ बर्ट सॅटिजिन यांनी वालचंद महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. वालचंद महाविद्यालयातील दोनदिवसीय पर्यावरण व स्थापत्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला, यावेळी सॅटिजिन बोलत होते. ते म्हणाले की, भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात जलव्यवस्थापनाची समस्या अधिक गंभीर आहे. नेदरलँडला ओला दुष्काळ सतावत असताना, भारतासारख्या देशात दुष्काळाची स्थिती आहे. जागतिक तापमानवाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, रासायनिक वायूंचे वाढते उत्सर्जन... अशी अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांची उकल स्थापत्य अभियंते आपणास देऊ शकतात. दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन असायला हवे. आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा या नियोजनात महत्त्वाचे आहे.नेदरलँडचे तज्ज्ञ थिस एडलकुर्ट म्हणाले की, आमच्या देशातील ‘अ‍ॅट्रेक्ट’ हे नव्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. त्यामुळे कार्बन डायॉक्साईडसारख्या वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. हे टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी झिरपण्यासाठी, पावसाचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी जागा आणि मजबूत रचना बनविली जात आहे. भारतीय शहरांमध्येही अशा उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मुंबईचे उमेश धारगळकर म्हणाले की, भारत ही २०५० मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र त्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित पुरोगामी समाजाची गरज आहे. प्रमुख शहरांमध्ये वीज, पाणी, सांडपाणी व कचरा यासारख्या सुविधांचा पुनर्विकास केला पाहिजे.परिषदेत रविवारी हैदराबाद येथील बी. उमाशंकर, बेंगलोरचे डॉ. के. आर. सुरेश, एस. रघुनाथ, विनोद होसूर या तज्ज्ञ संशोधकांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)