शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

जलव्यवस्थापनासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा

By admin | Updated: March 5, 2017 23:30 IST

बर्ट सॅटिजिन : वालचंदमधील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

सांगली : हवामानातील बदल आणि जलव्यवस्थापन यांचे जागतिक संदर्भ बदलत चालले आहेत. त्यासाठी स्मार्ट दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे, असे मत नेदरलँड येथील तज्ज्ञ बर्ट सॅटिजिन यांनी वालचंद महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. वालचंद महाविद्यालयातील दोनदिवसीय पर्यावरण व स्थापत्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला, यावेळी सॅटिजिन बोलत होते. ते म्हणाले की, भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात जलव्यवस्थापनाची समस्या अधिक गंभीर आहे. नेदरलँडला ओला दुष्काळ सतावत असताना, भारतासारख्या देशात दुष्काळाची स्थिती आहे. जागतिक तापमानवाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, रासायनिक वायूंचे वाढते उत्सर्जन... अशी अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांची उकल स्थापत्य अभियंते आपणास देऊ शकतात. दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन असायला हवे. आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा या नियोजनात महत्त्वाचे आहे.नेदरलँडचे तज्ज्ञ थिस एडलकुर्ट म्हणाले की, आमच्या देशातील ‘अ‍ॅट्रेक्ट’ हे नव्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. त्यामुळे कार्बन डायॉक्साईडसारख्या वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. हे टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी झिरपण्यासाठी, पावसाचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी जागा आणि मजबूत रचना बनविली जात आहे. भारतीय शहरांमध्येही अशा उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मुंबईचे उमेश धारगळकर म्हणाले की, भारत ही २०५० मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र त्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित पुरोगामी समाजाची गरज आहे. प्रमुख शहरांमध्ये वीज, पाणी, सांडपाणी व कचरा यासारख्या सुविधांचा पुनर्विकास केला पाहिजे.परिषदेत रविवारी हैदराबाद येथील बी. उमाशंकर, बेंगलोरचे डॉ. के. आर. सुरेश, एस. रघुनाथ, विनोद होसूर या तज्ज्ञ संशोधकांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)