शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

झोपडपट्टी धारकांची दिवाळी यंदाही रस्त्यावरच!

By admin | Updated: October 25, 2016 01:03 IST

घरकुलांचे स्वप्न भंगले : महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच

सांगली : गोरगरीब झोपडपट्टी धारकांना पक्क्या घरांचे स्वप्न दाखवत सहा वर्षापूर्वी महापालिकेने घरकुल योजना हाती घेतली. त्यातील बाल हनुमान घरकुल योजनेचे काम पूर्णही झाले. पण या घरकुलांचा ताबा देण्यात दिरंगाई झाल्याने यंदाही १७६ कुटुंबांना दिवाळी रस्त्यावरच साजरी करावी लागणार आहे. दिवाळीपूर्वी घरकुले ताब्यात देऊ, अशी भीमगर्जना महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी केली होती. त्यात आता विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे किमान महिनाभर तरी ही प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. महापालिकेने शहरातील चार हजार झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत प्रस्ताव सादर केला. केंद्र शासनाने ९८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. चार हजारपैकी १४०० घरकुलांचे काम हाती घेण्यात आले. इतर ठिकाणी झोपड्या हटविण्यास विरोध झाल्याने, महापालिकेने तेथील घरकुलांचे कामच रद्द केले. सांगलीतील बाल हनुमान, धोत्रेआबा, संजयनगर पत्रा चाळ, मिरजेतील इंदिरानगर, संजय गांधीनगर येथील झोपड्या हटवून घरकुलांचे काम सुरू करण्यात आले. तेथील झोपडपट्टी धारकांचे रस्त्याच्या कडेला पुनर्वसन करण्यात आले. त्यांच्यासाठी पाणी, विजेची व्यवस्था करण्यात आली. त्यावर दरवर्षी महापालिकेला एक ते सव्वाकोटीचा खर्च करावा लागत आहे. यापैकी बाल हनुमान घरकुल योजनेतील १७६ घरांचे काम पूर्ण झाले आहे. गत महिन्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारूण शिकलगार यांनी झोपडपट्टी धारकांची भेट घेऊन, दिवाळीपूर्वी घरांचा ताबा देण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यामुळे गेली सहा वर्षे रस्त्यावर जीवन कंठणाऱ्या झोपडपट्टी धारकांना यंदाची दिवाळी पक्क्या घरात साजरी होईल, अशी आशा लागली. पण त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महापौरांनी तर घरकुलांच्या सोडतीची तारीखही जाहीर केली होती. पण प्रशासनाच्या तिरक्या चालीमुळे सोडतीची तारीख ओलांडली तरी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. झोपडपट्टी धारकांनी आपल्या हिश्श्याची रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. तरीही त्यांना ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाची दिवाळीही या १७६ झोपडपट्टी धारकांना रस्त्यावरच साजरी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) आचारसंहिता आली आड झोपडपट्टी धारकांना घरकुले ताब्यात देण्यात अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. यापूर्वी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घरकुलांचे काम संथगतीने झाले. आता घरकुले पूर्ण झाली असतानाही, त्यांचा ताबा मिळत नाही. पालिकेतील महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करुनही लाल फितीच्या कारभाराचा फटका बसला आहे. आता तर विधानपरिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने घरकुलांची सोडत काढता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच घरकुलांचा निर्णय होणार आहे.