शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

विटा-गार्डी रस्त्यावर झाडांची कत्तल

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

तक्रारीनंतर वृक्षतोड बंद : अभय भंडारी यांची जागरुकता; ठेकेदारावर कारवाईची मागणी

विटा : विटा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने निविदा काढून ठेका दिलेल्या एका ठेकेदाराने विटा ते गार्डी रस्त्यावर धोकादायक नसलेल्या सुमारे ७० ते ७५ वर्षापूर्वीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, येथील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अभय भंडारी यांनी याबाबत आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने संबंधित वृक्षतोड बंद करण्यात आली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडांऐवजी धोका नसलेली लिंबाची पुरातन झाडे तोडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.खानापूर तालुक्यातील विटा-मायणी या राज्यमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ७० ते ७५ वर्षांपासूनची पुरातन लिंब व वडाची झाडे आहेत. यातील काही झाडे वाहनधारकांसाठी धोक्याची आहेत. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे गार्डी परिसरातील लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धोकादायक व वठलेली जुनी वडाची झाडे काढून घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार विटा ते गार्डी गावापर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पाहणी करून १५ धोकादायक झाडे काढण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार धोकादायक झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन एका ठेकेदाराला काम देण्यात आले. परंतु, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडे तशीच ठेवून साईडपट्ट्यांच्या आतील मोठी व फायद्याची झाडे तोडण्याचा सपाटा लावला. यावेळी ठेकेदाराने १५ पैकी दोन मोठी लिंबाची झाडे तोडली. हा प्रकार विटा येथील पर्यावरणप्रेमी अभय भंडारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संंबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विटा येथील उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांनी झाडे तोडण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. (वार्ताहर)राज्य शासन झाडे लावण्यासाठी मोठा खर्च करीत आहे. पण धोकादायक असल्याचे निमित्त करून जुनी ७० ते ८० वर्षांची झाडे तोडण्याचे पाप केले जाते. हे चुकीचे आहे. ठेकेदाराने तोडलेले एक झाड वाढण्यासाठी शंभर वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, ती झाडे अवघ्या पंधरा मिनिटात जमीनदोस्त होत आहेत. यापुढे पर्यावरण राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.- अभय भंडारी, पर्यावरणप्रेमी, विटानागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे : साखरेविटा ते माहुली रस्त्यावर दुतर्फा धोकादायक असलेली झाडे काढून घ्यावीत, अशी तक्रार लोकांनी सार्वजनिक बांधकामकडे केली होती. त्यामुळे केलेल्या पाहणीत नागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातील १५ झाडे गार्डी गावापर्यंत आहेत. रस्त्याच्या नाल्याबाहेर व साईडपट्टीवरीलच धोकादायक झाडे व रस्त्यावर आलेल्या फांद्या कापून घेण्याचे काम सुरू होते. परंतु, आजच्या तक्रारीनंतर ते थांबविण्यात आले आहे, असे उपअभियंताव्ही. व्ही. साखरे यांनी सांगितले.