शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

विटा-गार्डी रस्त्यावर झाडांची कत्तल

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

तक्रारीनंतर वृक्षतोड बंद : अभय भंडारी यांची जागरुकता; ठेकेदारावर कारवाईची मागणी

विटा : विटा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने निविदा काढून ठेका दिलेल्या एका ठेकेदाराने विटा ते गार्डी रस्त्यावर धोकादायक नसलेल्या सुमारे ७० ते ७५ वर्षापूर्वीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, येथील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अभय भंडारी यांनी याबाबत आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने संबंधित वृक्षतोड बंद करण्यात आली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडांऐवजी धोका नसलेली लिंबाची पुरातन झाडे तोडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.खानापूर तालुक्यातील विटा-मायणी या राज्यमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ७० ते ७५ वर्षांपासूनची पुरातन लिंब व वडाची झाडे आहेत. यातील काही झाडे वाहनधारकांसाठी धोक्याची आहेत. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे गार्डी परिसरातील लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धोकादायक व वठलेली जुनी वडाची झाडे काढून घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार विटा ते गार्डी गावापर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पाहणी करून १५ धोकादायक झाडे काढण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार धोकादायक झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन एका ठेकेदाराला काम देण्यात आले. परंतु, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडे तशीच ठेवून साईडपट्ट्यांच्या आतील मोठी व फायद्याची झाडे तोडण्याचा सपाटा लावला. यावेळी ठेकेदाराने १५ पैकी दोन मोठी लिंबाची झाडे तोडली. हा प्रकार विटा येथील पर्यावरणप्रेमी अभय भंडारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संंबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विटा येथील उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांनी झाडे तोडण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. (वार्ताहर)राज्य शासन झाडे लावण्यासाठी मोठा खर्च करीत आहे. पण धोकादायक असल्याचे निमित्त करून जुनी ७० ते ८० वर्षांची झाडे तोडण्याचे पाप केले जाते. हे चुकीचे आहे. ठेकेदाराने तोडलेले एक झाड वाढण्यासाठी शंभर वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, ती झाडे अवघ्या पंधरा मिनिटात जमीनदोस्त होत आहेत. यापुढे पर्यावरण राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.- अभय भंडारी, पर्यावरणप्रेमी, विटानागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे : साखरेविटा ते माहुली रस्त्यावर दुतर्फा धोकादायक असलेली झाडे काढून घ्यावीत, अशी तक्रार लोकांनी सार्वजनिक बांधकामकडे केली होती. त्यामुळे केलेल्या पाहणीत नागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातील १५ झाडे गार्डी गावापर्यंत आहेत. रस्त्याच्या नाल्याबाहेर व साईडपट्टीवरीलच धोकादायक झाडे व रस्त्यावर आलेल्या फांद्या कापून घेण्याचे काम सुरू होते. परंतु, आजच्या तक्रारीनंतर ते थांबविण्यात आले आहे, असे उपअभियंताव्ही. व्ही. साखरे यांनी सांगितले.