शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत पोलीस ठाण्यातून वाळूचे सहा ट्रक पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 01:21 IST

सात जणांवर गुन्हा : महसूल विभागाने घेतले होते ताब्यात

मिरज : मिरजेत वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने ताब्यात घेतलेले सहा वाळूचे ट्रक पोलीस ठाण्यातून परस्पर पळवून नेण्यात आले. बुधवारी मध्यरात्री मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळूसह सुमारे ५२ लाख रुपये किमतीचे सहा ट्रक चोरून नेल्याबद्दल मंडल अधिकारी विजय ढेरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रक मालक व चालक अशा अकरा जणांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून बेगमपूर येथून वाळूची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक तहसीलदारांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर ताब्यात घेतले होते. अवैध वाळू वाहतूकप्रकरणी दंडात्मक कारवाई व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी हे आठ ट्रक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्री यातील एमएच १० एक्यू ३३३७ (किंमत नऊ लाख रूपये), एमएच ०४ पीयु २७६१ (सहा लाख ५० हजार), एमएच १० बीआर ३९२७ (११ लाख ५० हजार) असे सुमारे ३८ लाख ५० हजाराचे हे चार व इतर दोन, असे सहा ट्रक बनावट किल्लीचा वापर करून वाळूसहीत चोरून नेले. याबाबत मिरजेचे मंडल अधिकारी विजय ढेरे यांनी, अनिल सूर्यवंशी (रा. जयसिंगपूर), तानाजी माने, तानाजी जाधव (रा. मंगळवेढा), पापा रामू राठोड (रा. जयसिंगपूर), बाबू केशव जाधव (रा. मंगळवेढा), मालक राजकुमार घाडगे (कवठेमहांकाळ) व चालक खंडू ईश्वर चव्हाण, प्रदीप पाटील, अनिल रायचूरकर (दोघे रा. सांगलीवाडी), दीपक खोत, बिरू बाळू मेटकरे (रा. घेरडी, ता. सांगोला ) या सर्वांनी संगनमताने ट्रक चोरून नेल्याचे ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातून एकाचवेळी चार ट्रक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)