शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सहा प्रादेशिक योजना आज बंद राहणार

By admin | Updated: October 1, 2015 00:36 IST

कर्मचाऱ्यांचा इशारा : थकित पगारप्रश्नी आंदोलनाचा पवित्रा

सांगली : कासेगाव, कुंडलसह सहा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांकडे काम करीत असलेल्या ६० कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून झालेला नाही. त्यांनी पगारासाठी दि. १ आॅक्टोबरपासून योजनेचे पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले. पण, निधीची पुरेशी तरतूद न झाल्यामुळे बुधवारी पगार होऊ शकले नाहीत. दोन दिवसात पगाराचे आश्वासन देऊनही कामगार आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे, सहा योजनांवरील ४७ गावांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.जिल्हा परिषद अकरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालवत आहे. त्यापैकी कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, नांद्रे-वसगडे, तुंग-बागणी, कुंडल आणि वाघोली या सहा प्रादेशिक योजनांकडील ६० कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून झालेला नाही. सेवानिवृत्त ११ कर्मचाऱ्यांची पेन्शनही दिली नाही. या कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पगाराच्या प्रश्नावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, या मागणीकडे प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे पाणी योजनेकडील ६० कर्मचाऱ्यांनी दि. १ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे सहा योजनांच्या लाभक्षेत्रातील ४७ गावांतील पाणी पुरवठा गुरुवारपासून विस्कळीत होण्याची शक्यता आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी पाणी योजनेकडील कर्मचारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. परंतु, या बैठकीत कामगारांच्या पगाराचा तोडगा निघाला नाही. दोन दिवसात पगार देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांना दिले. पण, या आश्वासनावर कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नसल्यामुळे त्यांनी नियोजित आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब शेलार या कर्मचाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)