शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

टाकळीत पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या ...

टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या गावास गेली दोन महिने पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत रस्त्याचे काम करत असलेल्या राजपथ या कंपनीस वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याचा व उपोषणाचा इशारा दिला. याची राजपथ कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनीचे काम त्वरित करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

विस्तारीकरणादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी येत असलेली जलवाहिनी रस्त्याकडेला पूर्ववत करण्याचे काम राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू आहे. या कंपनीकडून निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य आणि टाकळी ग्रामस्थांनी केली आहे.

नवी जोडणी केल्यानंतर दहा ते पंधरा ठिकाणी जलवाहिनीस गळती लागली आहे. यामुळे दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे यांनी सहकारी सहा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत प्रशासन सरपंच, ग्रामसेवक यांंच्याकडे दोन महिने पाणीपुरवठा बंदबाबत पूर्वकल्पना देऊन पर्यायी व्यवस्थेची मागणी केली होती. या मागणीस अनुसरून ग्रामसेवकांनी रस्त्याचे काम करणाऱ्या राजपत कंपनीस पत्रव्यवहार करून जलवाहिनीचे काम होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर देणे, चांगल्या प्रतीची जलवाहिनी जोडणी करणेबाबत मागणी केली होती. मात्र, राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून निकृष्ट कामे सुरूच आहेत. शिवाय कामास विलंब केला जात आहे. अवघ्या महिनाभरावर उन्हाळा येऊन ठेपल्याने बंद पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा पर्याय निवडला. ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गुळवणे, विमल इटनाळ, वसुंधरा पाटील, महावीर पाटील, अनिल लोखंडे, संजय पुजारी या सदस्यांनी राजीनामा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. याची राजपूत कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनी त्वरित बदलून देण्याचे व जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत टाकळी व सुभाषनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्यांनी आंदोलन पाठीमागे घेतले.

चौकट

गेली दोन महिने टाकळी गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत सरपंच, ग्रामविकास आधिकारी यांना पूर्वकल्पना देऊन पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यास असमर्थ असल्याने आम्ही ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी राजीनामा व उपोषणाचा इशारा दिला होता.

-सुनील गुळवणे, ग्रामपंचायत सदस्य, टाकळी