शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीत पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या ...

टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या गावास गेली दोन महिने पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत रस्त्याचे काम करत असलेल्या राजपथ या कंपनीस वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याचा व उपोषणाचा इशारा दिला. याची राजपथ कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनीचे काम त्वरित करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

विस्तारीकरणादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी येत असलेली जलवाहिनी रस्त्याकडेला पूर्ववत करण्याचे काम राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू आहे. या कंपनीकडून निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य आणि टाकळी ग्रामस्थांनी केली आहे.

नवी जोडणी केल्यानंतर दहा ते पंधरा ठिकाणी जलवाहिनीस गळती लागली आहे. यामुळे दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे यांनी सहकारी सहा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत प्रशासन सरपंच, ग्रामसेवक यांंच्याकडे दोन महिने पाणीपुरवठा बंदबाबत पूर्वकल्पना देऊन पर्यायी व्यवस्थेची मागणी केली होती. या मागणीस अनुसरून ग्रामसेवकांनी रस्त्याचे काम करणाऱ्या राजपत कंपनीस पत्रव्यवहार करून जलवाहिनीचे काम होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर देणे, चांगल्या प्रतीची जलवाहिनी जोडणी करणेबाबत मागणी केली होती. मात्र, राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून निकृष्ट कामे सुरूच आहेत. शिवाय कामास विलंब केला जात आहे. अवघ्या महिनाभरावर उन्हाळा येऊन ठेपल्याने बंद पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा पर्याय निवडला. ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गुळवणे, विमल इटनाळ, वसुंधरा पाटील, महावीर पाटील, अनिल लोखंडे, संजय पुजारी या सदस्यांनी राजीनामा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. याची राजपूत कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनी त्वरित बदलून देण्याचे व जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत टाकळी व सुभाषनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्यांनी आंदोलन पाठीमागे घेतले.

चौकट

गेली दोन महिने टाकळी गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत सरपंच, ग्रामविकास आधिकारी यांना पूर्वकल्पना देऊन पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यास असमर्थ असल्याने आम्ही ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी राजीनामा व उपोषणाचा इशारा दिला होता.

-सुनील गुळवणे, ग्रामपंचायत सदस्य, टाकळी