शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांनी घसरुन पडण्यापेक्षा सावरावं !

By admin | Updated: May 3, 2015 00:57 IST

जयंत पाटील : सहकार खात्याचा गैरवापर केला

नेवरी : जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालकांना अधिकारापासून दूर ठेवण्यासाठी सहकार खात्याचा गैरवापर करून बॅँकेवर व बाजार समितीवर प्रशासक नेमले गेले. शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेल्या बॅँकेमध्ये पक्षीय राजकारण नको. आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहोत. टीका टिप्पणी करून सारखे घसरणे आम्हाला शोभत नाही. घसरून पडणे आम्हाकडून होत नाही. त्यामुळे तुम्ही पडू नका, अशी टीका शेतकरी सहकार पॅनेलचे नेते आमदार जयंत पाटील यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. रायगाव (ता. कडेगाव) येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी सहकार पॅनेलची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अध्यक्षस्थानी होते. जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; परंतु काही मंडळींनी सवतासुभा मांडल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य नव्हते. विरोधकांना प्रत्यक्षात सत्ता मिळविणे शक्य नव्हते. सारखेसारखे बोलून घसरण्यापेक्षा व घसरून पडण्यापेक्षा विरोधकांनी थोडे स्वत:ला सावरायला हवे, अशी बोचरी टीका पाटील यांनी डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. खासदार संजय पाटील म्हणाले की, चांगल्या विचाराने काम करणारे लोक बँकेत आले पाहिजेत. शेतकरी सहकार पॅनेल पूर्णपणे पक्षविरहित आहे. यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी मजूर संस्थांची ई-टेंडर प्रणाली, व्हॅट, आयकर, आदी प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली. बिनविरोध निवडून आलेल्या दिलीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. विलासराव शिंदे, अरुणअण्णा लाड, लालासाहेब यादव, प्रा. सिकंदर जमादार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मजूर फेडरेशनचे माणिकराव जाधव, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, धोंडीराम महींद, सौ. कमल पाटील, सौ. श्रद्धा चरापले, सुरेश पाटील, बी. के .पाटील, विष्णू माने, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब होनमोरे, चंद्रसेन देशमुख, दत्तूशेठ सूर्यवंशी उपस्थित होते. सतीश देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)बाजार समितीवर जाणूनबुजून प्रशासक लोकनियुक्त संचालकांना त्यांनी काम करू न देता कामापासून व अधिकारापासून दूर ठेवले. मध्यंतरी बँकेवर प्रशासक असल्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही. आमच्यासमोर जे पॅनेल आहे, त्यांना उमेदवारही देता आले नाहीत. त्यांना तत्त्वाची, विचारांची जोड नाही. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी निवडणूक लढविणाऱ्यांचा निर्णय मतदारांनी घ्यावा.