शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगक्षेत्राची परिस्थिती बिकट, लॉकडाऊनचे नको पुन्हा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून काही प्रमाणात सावरलेल्या उद्योजकांमध्ये लॉकडाऊनच्या पर्यायाबद्दल चिंता व्यक्त केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून काही प्रमाणात सावरलेल्या उद्योजकांमध्ये लॉकडाऊनच्या पर्यायाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन झाल्यास जिल्ह्यातील उद्योजक होणारे नुकसान सहन करू शकणार नाहीत. येथील उद्योग क्षेत्र पूर्णपणे विस्कळीत होईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लॉकडाऊनची चर्चा जोर धरत आहे. कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात येत असताना ती थांबविण्यासाठी शासनाच्या वतीने व जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. सध्या रात्रीची संचारबंदी व व्यापार, व्यावसायास वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापुढील टप्पा लॉकडाऊनचा असू शकतो, असा इशाराही शासनस्तरावर देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा लाॅकडाऊन परवडणारा नसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

कोट

मोठ्या आर्थिक संकटातून उद्योग आता कुठे रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनची चर्चा व त्याबाबतचा पर्याय शासनामार्फत पुढे केला जात आहे. ही गोष्ट उद्योग घटकासाठी त्रासदायी व मोठे संकट घेऊन येणारी आहे. कामगार, उद्योग व अन्य सर्वच घटक यात भरडले जातील. त्यामुळे शासनाने, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा.

- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

कोट

लॉकडाऊनबाबत शासनाने, प्रशासनाने अजिबात विचार करू नये. उद्योजक, कामगार, वित्तीय संस्था, ठेवीदार अशा विविध घटकांना याचा मोठा आर्थिक फटका बसेल. जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा कोलमडेल. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळावी, लसीकरणाला प्रतिसाद द्यावा. या उपायांचा चांगला परिणाम होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल.

- सचिन पाटील, अध्यक्ष, वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली

कोट

मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आता पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करण्याची ताकद उद्योजकांत राहिलेली नाही. हे क्षेत्र संकटात असल्याने लॉकडाऊनचा पर्याय नको. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास त्यातून सावरणे आम्हाला कठीण जाईल. हातावरचे पोट असणारेही यात उद्ध्वस्त होतील.

- संतोष भावे, उपाध्यक्ष, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत, मिरज

कोट

उद्योजकांचे अर्थचक्र आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊनची चर्चा होणे चुकीचे आहे. पुन्हा हे संकट पचविणे उद्योजकांना शक्य होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांच्या भावना व अडचणी समजून घ्याव्यात. शासनाकडे आमची कोणतीही मागणी नाही, केवळ उद्योजकांना कोणताही त्रास होऊ नये इतकी दक्षता घ्यावी, ही अपेक्षा आहे.

-उद्धव दळवी, उद्योजक मिरज