शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जिल्ह्यातील वाळू तस्कर होऊ लागले शिरजोर

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

प्रशासनात मतभिन्नता : चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश कोणाचा?; तलाठी, कोतवाल ‘लक्ष्य’

सांगली : घटना क्रमांक एक : जतचे तहसीलदार अभिजित पाटील पथकासह संख येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी थांबले असताना, वाळू वाहतूकदारांकडून पथकाचे वाहन ढकलण्याचा झालेला प्रयत्न... घटना क्रमांक दोन : वाळू वाहतूक रोखण्यासाठी करंजेत थांबलेल्या तलाठी, कोतवालावर वाळू तस्करांनी केलेला हल्ला... घटना क्रमांक तीन : उंबरगाव (ता. आटपाडी) येथे वाळू साठ्यावर कारवाईवेळी मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या पथकावर हल्ला. आठवड्यात जिल्ह्यात वाळू तस्करांकडून झालेल्या पथकावरील हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. या मोहिमेला प्रतिसादही मिळताना दिसत असताना, गेल्या आठवड्यापासून महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पथकात पोलीस नसल्याचा पुरेपूर अंदाज आलेल्या वाळू तस्करांनी आता थेट पथकालाच लक्ष्य केल्याने, जिल्ह्यात सुरू असलेली वाळू तस्करांविरोधातील मोहीम बारगळण्याची शक्यता आहे. वाळू तस्करांनी आता पथकाला न जुमानता हल्ल्यांचे सत्र राबविल्याने, महसूल विभागाच्या पथकाला पुरेसे संरक्षण व पथकात पोलीस प्रशासनातील व्यक्तींचा समावेश आवश्यक आहे. पथकावर हल्ला करुन दहशत निर्माण करु पाहणाऱ्या वाळू माफियांना नक्की बळ कोणाचे मिळत आहे, याच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केल्यास, वाळू माफियांची दहशत मोडीत काढण्यास मदत होणार आहे. अवैध वाळूची वाहतूक रात्रीच होत असल्याने पथकाला संरक्षण गरजेचे बनले आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्हास्तरावर अवैध गौणखनिजाची वाहतूक व उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ यांची संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य असणार आहेत, तर जिल्हा खणीकर्म अधिकारी या समितीचे सचिव असणार आहेत. जिल्ह्यात अजून या समितीची स्थापना झालेली नसल्याने महसूल विभागाच्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी या पथकाची निर्मिती आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महसूल, पोलीस, आरटीओ संयुक्त पथकाची प्रतीक्षाशासनाच्या नवीन आदेशानुसार अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल पोलीस व आरटीओंच्या संयुक्त पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. पथकात पोलिसांचा समावेश असल्यास वाळू तस्करांवर जरब बसेल व आरटीओंच्या समावेशाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोयीचे जाईल, हे या संयुक्त पथकाचे धोरण असल्याने जिल्ह्यात या संयुक्त समितीची स्थापन होण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूकदारांकडून हल्ल्याच्या घटना घडत असताना या विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’होते. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबत आधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.