शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

आंध्रातील सिंघम सुमित गरुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा ...

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा कोणत्याही प्रदेशात. आपलं वेगळपण या मातीने नेहमीच जपले आणि ते वेगळेपण इथल्या माणसांमध्ये रुजविले आहे. याची साक्ष मिळते, ती इस्लामपूर येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या आंध्र प्रदेशमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुमित गरुड यांच्यामुळे. एका बाजूला आपल्या अधिकाराने गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी धडाकेबाज सिंघम अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या सहकाऱ्यांविषयी अनोखे उपक्रम राबवून जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजाविणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली आहे.

दहावीत ९५.०६ टक्के गुणांनी कोल्हापूर विभागात प्रथम; बारावीत ९६ टक्के गुणांसह बोर्डात सहावा; मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण आणि २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नांत यश संपादन करीत आयपीएस होण्याचा मान. असा हा शैक्षणिक प्रवास संपल्यानंतर सुमित गरुड यांनी आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेला आंध्र प्रदेशमधून सुरुवात केली. विजयनगरम्, विशाखापट्टणम्‌ येथे सेवा बजावत सध्या ते काकीनाडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये अवैध वाळू उपसा आणि दारू व्यवसायाला चाप लावण्यासाठी तेथील सरकारने मोजक्याच अधिकाऱ्यांवर विशेष मोहीम राबविली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सुमित गरुड यांची निवड करण्यात आली आहे. धडाकेबाज कामगिरी, रोखठोक भूमिका यामुळे गरुड यांनी आंध्र प्रदेश पोलीस प्रशासनात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामुळेच या मोहिमेमध्ये त्यांना संधी मिळाली आहे. गत काही दिवसांमध्ये त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये स्वत:ची जरब निर्माण केली आहे.

या कामगिरीबरोबरच त्यांनी पोलीस प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांसाठीही विशेष उपक्रम राबवत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. ‘वनिता वनी’ या नावाने हा उपक्रम असून, याअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांच्या कामातील विविध समस्या, काैटुंबिक अडचणी, शारीरिक समस्या याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलले आहे.