शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारतीय तांदळाची आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

वेल्थ पेजसाठी अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती ...

वेल्थ पेजसाठी

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगरबासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यातवाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यांत आणखी उच्चांकी वाढ हाेण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.

भारतातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी बासमती व बिगरबासमती तांदळाची निर्यात होत असते. बासमती तांदळापैकी ८० टक्के माल मध्य-पूर्व देशात म्हणजेच, अरब राष्ट्रांमध्ये जात असतो. यातील अनेक देशांनी कोविड कायम राहण्याच्या भीतीने मागणीपेक्षा जास्त तांदळाची साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर ३.८ मिलियन टन (३३,८०,६५४ टन) निर्यात झाली आहे. मार्चअखेर ती ४.५ मिलियन टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी 'लाेकमत'शी बोलताना सांगितले की, बासमतीपेक्षा बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा उच्चांक नोंदला जाणार आहे. २०१९-२० मध्ये ५ मिलियन टन तांदूळ निर्यात झाला होता. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२१ पर्यंत ९.६ मिलियन टन तांदळाची निर्यात झाली आहे. मार्चअखेर ही निर्यात १४ मिलियनपर्यंत जाऊ शकते.

थायलंड, व्हिएतनाम व पाकिस्तान या तांदूळ निर्यातदार व स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदळाचा दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० डॉलरने कमी आहे. भारतातील ७० टक्के माल आफ्रिकन देशात जातो. ज्याठिकाणी दरांची मोठी स्पर्धा असते. त्यामुळे भारतीय तांदळाला मागणी अधिक आहे.

चौकट

निर्यात वाढत असताना देशांतर्गत बाजारात बिगरबासमती तांदळाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही महिन्यांत हे दर चढेच राहणार आहेत. इंधन दरवाढीचाही त्यावर परिणाम होत आहे.

कोट

देशात यंदा तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या काही वर्षांतील निर्यातीचा उच्चांक यंदा नोंदला जाईल. पुढील आर्थिक वर्षातही तांदळाच्या निर्यातीला अत्यंत चांगले वातावरण राहील.

-विनोद कौल, कार्यकारी संचालक, ऑल इंडिया राईस, एक्सपोर्ट, असोसिएशन, दिल्ली