शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

इस्लामपुुरात अकरानंतर रस्त्यावर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

अकरानंतर संचारबंदी आणि तापमानात वाढ झाल्याने शहरातील रस्ते ओस पडले आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शासनाने अत्यावश्यक सेवा ...

अकरानंतर संचारबंदी आणि तापमानात वाढ झाल्याने शहरातील रस्ते ओस पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता १५ एप्रिलपासून पूर्णत: संचारबंदी जाहीर केली. सकाळी ७ ते ११ या दरम्यान फळे, भाजीपाला, दूध आणि किराणा दुकाने यांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या दोन तासात रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसत आहे. यातच आता शहरातील तापमान ३८ अंशांपेक्षा जास्त असल्याने मुख्य रस्ते ओस पडू लागले आहेत.

कोरोनाचा कहर वाढत असल्याने पूर्णत: संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यातच आता वीकेंडचा रविवार असल्याने प्रशासकीय आणि बॅँकिंग सेवाही बंद आहेत. सकाळच्या सत्रात भाजीपाला आणि किराणा खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतात. याठिकाणी नेहमीच सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसते. अकरानंतर किमान अर्धा तास रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना उठवताना पालिका प्रशासन आणि पोलिसांची दमछाक होते. हे विक्रेते स्वत:हून संचारबंदीचे पालन करत नाहीत. यावर पालिका प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

सध्या तापमान वाढले असून, शहरातील तापमानही ३८च्या दरम्यान असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. महसूल कार्यालय बंद असल्याने तहसीलदार कार्यालयासमोरील चौकामध्येही शुकशुकाट आहे. गांधी चौक, बसस्थानक रोड आणि मुख्य रस्त्यावरील व्यापारी पेठा बंद असल्याने या रस्त्यावरील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तरीही काही दुचाकीस्वार विनाकारण रस्त्यावरून फिरत असल्याचे दिसतात. अतितापमानापुळे पोलिसांचा फौजफाटाही विश्रांतीच्या छायेत आहे. एकंदरीत असेच वातावरण काही दिवस राहिले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हरवण्यास वेळ लागणार नाही.

कोट

तापमान जादा असले तरी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पहिला आणि दुसरा डोस देण्याचे काम उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही दुपारपर्यंत दीडशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ९ हजारांच्या वर लसीकरण झाले आहे.

- डॉ. नरसिंग देशमुख, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर