शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शेट्टी-जयंतराव एकत्र येण्याचे संकेत जिल्हा परिषद निवडणुकीतच - सदाभाऊ खोत

By admin | Updated: July 1, 2017 21:02 IST

राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 1-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
 
खा. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू असून, भाजपासोबत राहायचे की संघटनेसोबत याविषयी निर्णय घेण्याबाबत शेट्टी यांनी खोत यांना ४ जुलैपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. याबाबत विचारले असता खोत म्हणाले की, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. वैचारिक संघर्षामध्ये चौकशी समिती नेमली जाते. मात्र ज्यांना व्यक्तिद्वेषाची लागण झाली आहे, त्यांना द्वेषातून निर्णय घेण्यासाठी त्रयस्थाची मदत घेण्याची गरजच काय?.
 
खा. शेट्टी व जयंत पाटील एकत्र येत आहेत का, या प्रश्नावर एकदम उसळून खोत म्हणाले की, बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच त्याचे संकेत मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? राज्यातील शेतकºयांचे प्रश्न सुटत नाहीत, असा ठपका ठेवत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी खा. शेट्टी यांच्याकडे राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधल्यावर खोत म्हणाले की, तुपकर यांनी कोणाकडे राजीनामा दिला, याची माहिती नाही. 
 
दिलेला राजीनामा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा असेल तर सामान्यपणे हा राजीनामा मुख्यमंत्री अथवा राज्यपालांकडे द्यावा लागतो! शेवटी लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते म्हणाले की, आघाडी सरकारने पंधरा वर्षांत शेतक-यांची घोर निराशा केली होती. आता आमचे सरकार शेतक-यांच्या शिवाराच्या दिशेने जात आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना न मागता २५० रुपये प्रतिटनाची एफआरपीमध्ये दिलेली वाढ सरकार शेतक-यांच्या बाजूचे आहे, असे दर्शवणारी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसची सत्ता गेल्याने त्यांच्या नेत्यांना काही काम नाही. रिकामे डोके सैतानाचे असते, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
 
राज्यातील शेतकºयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन खोत म्हणाले की, राज्यात सर्वत्र पाऊसमान चांगले आहे. धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत आहे. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतक-यांच्या खळ्यावर धान्याच्या राशी फुलू देत, असे साकडे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला घालणार आहे.