शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शेट्टी-जयंतराव एकत्र येण्याचे संकेत जिल्हा परिषद निवडणुकीतच - सदाभाऊ खोत

By admin | Updated: July 1, 2017 21:02 IST

राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 1-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
 
खा. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू असून, भाजपासोबत राहायचे की संघटनेसोबत याविषयी निर्णय घेण्याबाबत शेट्टी यांनी खोत यांना ४ जुलैपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. याबाबत विचारले असता खोत म्हणाले की, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. वैचारिक संघर्षामध्ये चौकशी समिती नेमली जाते. मात्र ज्यांना व्यक्तिद्वेषाची लागण झाली आहे, त्यांना द्वेषातून निर्णय घेण्यासाठी त्रयस्थाची मदत घेण्याची गरजच काय?.
 
खा. शेट्टी व जयंत पाटील एकत्र येत आहेत का, या प्रश्नावर एकदम उसळून खोत म्हणाले की, बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच त्याचे संकेत मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? राज्यातील शेतकºयांचे प्रश्न सुटत नाहीत, असा ठपका ठेवत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी खा. शेट्टी यांच्याकडे राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधल्यावर खोत म्हणाले की, तुपकर यांनी कोणाकडे राजीनामा दिला, याची माहिती नाही. 
 
दिलेला राजीनामा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा असेल तर सामान्यपणे हा राजीनामा मुख्यमंत्री अथवा राज्यपालांकडे द्यावा लागतो! शेवटी लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते म्हणाले की, आघाडी सरकारने पंधरा वर्षांत शेतक-यांची घोर निराशा केली होती. आता आमचे सरकार शेतक-यांच्या शिवाराच्या दिशेने जात आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना न मागता २५० रुपये प्रतिटनाची एफआरपीमध्ये दिलेली वाढ सरकार शेतक-यांच्या बाजूचे आहे, असे दर्शवणारी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसची सत्ता गेल्याने त्यांच्या नेत्यांना काही काम नाही. रिकामे डोके सैतानाचे असते, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
 
राज्यातील शेतकºयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन खोत म्हणाले की, राज्यात सर्वत्र पाऊसमान चांगले आहे. धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत आहे. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतक-यांच्या खळ्यावर धान्याच्या राशी फुलू देत, असे साकडे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला घालणार आहे.