शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेट्टी-जयंतराव एकत्र येण्याचे संकेत जिल्हा परिषद निवडणुकीतच - सदाभाऊ खोत

By admin | Updated: July 1, 2017 21:02 IST

राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 1-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
 
खा. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू असून, भाजपासोबत राहायचे की संघटनेसोबत याविषयी निर्णय घेण्याबाबत शेट्टी यांनी खोत यांना ४ जुलैपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. याबाबत विचारले असता खोत म्हणाले की, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. वैचारिक संघर्षामध्ये चौकशी समिती नेमली जाते. मात्र ज्यांना व्यक्तिद्वेषाची लागण झाली आहे, त्यांना द्वेषातून निर्णय घेण्यासाठी त्रयस्थाची मदत घेण्याची गरजच काय?.
 
खा. शेट्टी व जयंत पाटील एकत्र येत आहेत का, या प्रश्नावर एकदम उसळून खोत म्हणाले की, बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच त्याचे संकेत मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? राज्यातील शेतकºयांचे प्रश्न सुटत नाहीत, असा ठपका ठेवत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी खा. शेट्टी यांच्याकडे राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधल्यावर खोत म्हणाले की, तुपकर यांनी कोणाकडे राजीनामा दिला, याची माहिती नाही. 
 
दिलेला राजीनामा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा असेल तर सामान्यपणे हा राजीनामा मुख्यमंत्री अथवा राज्यपालांकडे द्यावा लागतो! शेवटी लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते म्हणाले की, आघाडी सरकारने पंधरा वर्षांत शेतक-यांची घोर निराशा केली होती. आता आमचे सरकार शेतक-यांच्या शिवाराच्या दिशेने जात आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना न मागता २५० रुपये प्रतिटनाची एफआरपीमध्ये दिलेली वाढ सरकार शेतक-यांच्या बाजूचे आहे, असे दर्शवणारी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसची सत्ता गेल्याने त्यांच्या नेत्यांना काही काम नाही. रिकामे डोके सैतानाचे असते, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
 
राज्यातील शेतकºयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन खोत म्हणाले की, राज्यात सर्वत्र पाऊसमान चांगले आहे. धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत आहे. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतक-यांच्या खळ्यावर धान्याच्या राशी फुलू देत, असे साकडे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला घालणार आहे.