शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

‘बंद’चा भाजीपाला उत्पादकांना फटका

By admin | Updated: July 13, 2016 00:43 IST

ढबू मिरची, कोबी पावसाने सडला : तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील चित्र

सांगली : मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील भाजीपाला व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. परिणामी वाळवा, मिरज, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना दोन दिवसात तीन ते चार कोटींचा फटका बसला आहे. तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर पावसात भिजल्यामुळे सडून गेला आहे. राज्य शासनाने भाजीपाला आणि शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून अडतही न घेता ती व्यापाऱ्यांनी विकणाऱ्यांकडून वसूल करण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी भाजीपाला व अन्य शेतीमाल खरेदी बंद केली आहे. मिरज तालुक्यातील समडोळी, तुंग, कवठेपिरान, कसबेडिग्रज, मल्लेवाडी, खंडेराजुरी, एरंडोली. वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी येथून मोठ्याप्रमाणात ढबू मिरची मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील मार्केटला जाते. तुंग परिसरातून जय हनुमान भाजीपाला पुरवठा व प्रक्रिया संघाच्या माध्यमातून दररोज दहा टनाच्या सहा ट्रकमधून ढबू, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला मुंबई, पुणे येथे पाठविला जातो. रविवारीच मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांनी बंद असल्यामुळे मुंबई, पुणे येथे भाजीपाला आणू नये, अशी सूचना दिली आहे. यामुळे सध्या तयार झालेली ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल शेतात तसाच पडून आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला सडण्याची प्रक्रिया चालू असल्याचे संघाचे अध्यक्ष सचिन डांगे यांनी सांगितले.तुंग परिसराबरोबरच आष्टा, बागणी, दुधगाव, कवठेपिरान येथूनही रोज सहा ट्रक ढबू, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल मुंबई व पुणे येथे जात आहे. आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव येथूनही काही शेतकरी ढबू मिरची, टोमॅटो, शेवगा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील मार्केटला पाठवत आहेत. येथील व्यापाऱ्यांनीही खरेदी बंद केल्यामुळे आणि भाजीपाला मुबलक असल्यामुळे तो विक्री करण्याचे व्यवस्थापन होत नाही. (प्रतिनिधी)विष्णुअण्णा मार्केटमध्ये लाखोची उलाढाल ठप्पविष्णुअण्णा फळ मार्केट येथे कांदा, बटाटा, लसूण आदीचे सौदे बंद आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात येथील लाखो रूपयांची उलाढाल ठप्प झाली असून किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दर दोन ते तीन रूपयांनी वाढले आहेत. शिवाजी मंडई येथे मात्र काही शेतकऱ्यांनी स्वत:च भाजीपाला विक्री सुरु केल्यामुळे सांगलीतील ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे. फळांचे व्यवहार पूर्ववत सुरु असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.आष्ट्याचा भाजीपाला हैदराबादलामुंबई, पुणे शहरात ढबू मिरची, कोबी, फ्लॉवरची मागणी सर्वाधिक असते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे आष्टा येथील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी हैदराबाद मार्केटला ढबू, कोबी, फ्लॉवरचे तीन ते चार ट्रक पाठविले आहेत. या मालाला तेथे दरही चांगला मिळाला असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचा असाच बंद सुरू राहिल्यास तुंग, समडोळी, कवठेपिरान येथीलही शेतकरी हैदराबाद, बेळगावला भाजीपाला पाठविण्याच्या तयारीत आहेत.शासनाकडूनच शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरजशासनाने बाजार समितीच्या बंधनातून भाजीपाला व अन्य शेतीमाल विक्रीसाठी मुक्त केला आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत स्वत:च भाजीपाला विक्री करावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण, शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठीची शासनाने यंत्रणा तयार केली पाहिजे. मुंबई, पुणे येथे पन्नास ते साठ शेतकऱ्यांचा रोज दहा ट्रक भाजीपाला फक्त सांगली जिल्ह्यातून जात आहे. हा भाजीपाला मुंबई, पुणे येथे जाऊन विक्री करणे पन्नास शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. भाजीपाला शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याविषयीही शासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.