शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

‘बंद’चा भाजीपाला उत्पादकांना फटका

By admin | Updated: July 13, 2016 00:43 IST

ढबू मिरची, कोबी पावसाने सडला : तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील चित्र

सांगली : मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील भाजीपाला व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. परिणामी वाळवा, मिरज, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना दोन दिवसात तीन ते चार कोटींचा फटका बसला आहे. तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर पावसात भिजल्यामुळे सडून गेला आहे. राज्य शासनाने भाजीपाला आणि शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून अडतही न घेता ती व्यापाऱ्यांनी विकणाऱ्यांकडून वसूल करण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी भाजीपाला व अन्य शेतीमाल खरेदी बंद केली आहे. मिरज तालुक्यातील समडोळी, तुंग, कवठेपिरान, कसबेडिग्रज, मल्लेवाडी, खंडेराजुरी, एरंडोली. वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी येथून मोठ्याप्रमाणात ढबू मिरची मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील मार्केटला जाते. तुंग परिसरातून जय हनुमान भाजीपाला पुरवठा व प्रक्रिया संघाच्या माध्यमातून दररोज दहा टनाच्या सहा ट्रकमधून ढबू, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला मुंबई, पुणे येथे पाठविला जातो. रविवारीच मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांनी बंद असल्यामुळे मुंबई, पुणे येथे भाजीपाला आणू नये, अशी सूचना दिली आहे. यामुळे सध्या तयार झालेली ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल शेतात तसाच पडून आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला सडण्याची प्रक्रिया चालू असल्याचे संघाचे अध्यक्ष सचिन डांगे यांनी सांगितले.तुंग परिसराबरोबरच आष्टा, बागणी, दुधगाव, कवठेपिरान येथूनही रोज सहा ट्रक ढबू, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल मुंबई व पुणे येथे जात आहे. आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव येथूनही काही शेतकरी ढबू मिरची, टोमॅटो, शेवगा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील मार्केटला पाठवत आहेत. येथील व्यापाऱ्यांनीही खरेदी बंद केल्यामुळे आणि भाजीपाला मुबलक असल्यामुळे तो विक्री करण्याचे व्यवस्थापन होत नाही. (प्रतिनिधी)विष्णुअण्णा मार्केटमध्ये लाखोची उलाढाल ठप्पविष्णुअण्णा फळ मार्केट येथे कांदा, बटाटा, लसूण आदीचे सौदे बंद आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात येथील लाखो रूपयांची उलाढाल ठप्प झाली असून किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दर दोन ते तीन रूपयांनी वाढले आहेत. शिवाजी मंडई येथे मात्र काही शेतकऱ्यांनी स्वत:च भाजीपाला विक्री सुरु केल्यामुळे सांगलीतील ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे. फळांचे व्यवहार पूर्ववत सुरु असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.आष्ट्याचा भाजीपाला हैदराबादलामुंबई, पुणे शहरात ढबू मिरची, कोबी, फ्लॉवरची मागणी सर्वाधिक असते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे आष्टा येथील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी हैदराबाद मार्केटला ढबू, कोबी, फ्लॉवरचे तीन ते चार ट्रक पाठविले आहेत. या मालाला तेथे दरही चांगला मिळाला असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचा असाच बंद सुरू राहिल्यास तुंग, समडोळी, कवठेपिरान येथीलही शेतकरी हैदराबाद, बेळगावला भाजीपाला पाठविण्याच्या तयारीत आहेत.शासनाकडूनच शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरजशासनाने बाजार समितीच्या बंधनातून भाजीपाला व अन्य शेतीमाल विक्रीसाठी मुक्त केला आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत स्वत:च भाजीपाला विक्री करावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण, शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठीची शासनाने यंत्रणा तयार केली पाहिजे. मुंबई, पुणे येथे पन्नास ते साठ शेतकऱ्यांचा रोज दहा ट्रक भाजीपाला फक्त सांगली जिल्ह्यातून जात आहे. हा भाजीपाला मुंबई, पुणे येथे जाऊन विक्री करणे पन्नास शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. भाजीपाला शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याविषयीही शासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.