शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

शिराळ्यात श्रेयवादाचा फड...

By admin | Updated: April 6, 2016 00:11 IST

घरकुलाचा वाद : गुंडगेवाडीतील जळीतग्रस्तांची झालीय कुचेष्टा

अशोक पाटील -- इस्लामपूरशिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील कार्यकर्त्यांना तिन्ही गटाचे नेते आश्वासन व पैशाच्या जोरावर नेहमीच गुंडाळत आले आहेत. या भागातील कार्यकर्तेही ‘खोबरं तिकडं चांगभलं’ करत वारंवार या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतात. ऐन दिवाळीत गुंडगेवाडी येथील ८ घरे जळून खाक झाली होती. त्यांना जिल्हा परिषदेच्या फंडातून घरकुल मंजूर झाली आहेत. याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचे जि. प. सदस्य रणधीर नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यात चढाओढ लागली आहे. यामुळे जळीतग्रस्तांसह तेथील कार्यकर्त्यांची कुचेष्टाच सुरु आहे.शिराळा मतदारसंघात विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी तिन्ही गटात नेहमीच संघर्ष असतो. विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक मंत्री पदाच्या कुंपणावर आहेत. त्यामुळे शिराळ्यातील राजकीय हवा थोडी नरमच आहे. छोट्या-मोठ्या विकासकामांचा श्रेयवाद लाटण्यासाठी तिन्ही गटाचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी मग्न असतात.विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे अलीकडील काळात माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख हे एकत्र आले आहेत. त्यांची समझोता एक्स्प्रेस सध्या सुसाट असली, तरी ती कोणत्या क्षणी रुळावरुन खाली येईल, याची शाश्वती नाही. सध्या तरी दोन भाऊ एकत्रित येऊन विकासकामांचे श्रेय लाटताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडी करत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, त्यांचे चिरंजीव जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनीही विकासाचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिराळकरांसह कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.दोन दिवसांपूर्वीच मानकरवाडी तलावात आलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याचे पूजन जि. प. सदस्य रणधीर नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. हे पाणी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच आल्याचे यावेळी रणधीर नाईक यांनी स्पष्ट केले. या पाणी पूजनाला काही तासच लोटतात तोच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई धरणातून मानकरवाडी तलावात आले. हे काम मी प्रयत्न करुन आणलेल्या निधीमुळेच झाल्याचे सांगत या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.गुंडगेवाडी येथील जळीतग्रस्तांना घरकुल मिळावे म्हणून माजी पं. स. सभापती हणमंतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सत्यजित देशमुख आणि जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांच्या प्रयत्नाने ही घरकुले मंजूर झाली आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. कोणत्याही परिस्थितीत जळीतग्रस्तांचा प्रश्न सुटण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.- लिंबाजी पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली शिफारस कुणाची : श्रेय कुणाचे?गुंडगेवाडी येथील ८ जळीतग्रस्तांना जि. प. च्या निधीतून यशवंत घरकुल मंजूर झाले आहे. हा मतदार संघ रणधीर नाईक यांचा नसतानाही त्यांनी श्रेय लाटण्याच्या उद्देशाने प्रथम या घरकुल मंजुरीची घोषणा केली. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच या मतदारसंघातील काँग्रेसच्या जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांनी यशवंत घरकुल योजनेचा लाभ मी माझ्या स्वत:च्या शिफारशीने मिळवून दिला आहे. प्रत्येक कुटुंबास ७५ हजार रुपये मिळणार आहेत. ही गावे माझ्या मतदार संघातील असताना रणधीर नाईक यांना याबाबत बोलण्याचा काय अधिकार आहे, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. सुशिला नांगरे या सत्यजित देशमुख यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन नांगरे यांनी रणधीर नाईक यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.