शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

शिराळ्यात श्रेयवादाचा फड...

By admin | Updated: April 6, 2016 00:11 IST

घरकुलाचा वाद : गुंडगेवाडीतील जळीतग्रस्तांची झालीय कुचेष्टा

अशोक पाटील -- इस्लामपूरशिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील कार्यकर्त्यांना तिन्ही गटाचे नेते आश्वासन व पैशाच्या जोरावर नेहमीच गुंडाळत आले आहेत. या भागातील कार्यकर्तेही ‘खोबरं तिकडं चांगभलं’ करत वारंवार या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतात. ऐन दिवाळीत गुंडगेवाडी येथील ८ घरे जळून खाक झाली होती. त्यांना जिल्हा परिषदेच्या फंडातून घरकुल मंजूर झाली आहेत. याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचे जि. प. सदस्य रणधीर नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यात चढाओढ लागली आहे. यामुळे जळीतग्रस्तांसह तेथील कार्यकर्त्यांची कुचेष्टाच सुरु आहे.शिराळा मतदारसंघात विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी तिन्ही गटात नेहमीच संघर्ष असतो. विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक मंत्री पदाच्या कुंपणावर आहेत. त्यामुळे शिराळ्यातील राजकीय हवा थोडी नरमच आहे. छोट्या-मोठ्या विकासकामांचा श्रेयवाद लाटण्यासाठी तिन्ही गटाचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी मग्न असतात.विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे अलीकडील काळात माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख हे एकत्र आले आहेत. त्यांची समझोता एक्स्प्रेस सध्या सुसाट असली, तरी ती कोणत्या क्षणी रुळावरुन खाली येईल, याची शाश्वती नाही. सध्या तरी दोन भाऊ एकत्रित येऊन विकासकामांचे श्रेय लाटताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडी करत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, त्यांचे चिरंजीव जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनीही विकासाचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिराळकरांसह कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.दोन दिवसांपूर्वीच मानकरवाडी तलावात आलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याचे पूजन जि. प. सदस्य रणधीर नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. हे पाणी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच आल्याचे यावेळी रणधीर नाईक यांनी स्पष्ट केले. या पाणी पूजनाला काही तासच लोटतात तोच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई धरणातून मानकरवाडी तलावात आले. हे काम मी प्रयत्न करुन आणलेल्या निधीमुळेच झाल्याचे सांगत या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.गुंडगेवाडी येथील जळीतग्रस्तांना घरकुल मिळावे म्हणून माजी पं. स. सभापती हणमंतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सत्यजित देशमुख आणि जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांच्या प्रयत्नाने ही घरकुले मंजूर झाली आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. कोणत्याही परिस्थितीत जळीतग्रस्तांचा प्रश्न सुटण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.- लिंबाजी पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली शिफारस कुणाची : श्रेय कुणाचे?गुंडगेवाडी येथील ८ जळीतग्रस्तांना जि. प. च्या निधीतून यशवंत घरकुल मंजूर झाले आहे. हा मतदार संघ रणधीर नाईक यांचा नसतानाही त्यांनी श्रेय लाटण्याच्या उद्देशाने प्रथम या घरकुल मंजुरीची घोषणा केली. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच या मतदारसंघातील काँग्रेसच्या जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांनी यशवंत घरकुल योजनेचा लाभ मी माझ्या स्वत:च्या शिफारशीने मिळवून दिला आहे. प्रत्येक कुटुंबास ७५ हजार रुपये मिळणार आहेत. ही गावे माझ्या मतदार संघातील असताना रणधीर नाईक यांना याबाबत बोलण्याचा काय अधिकार आहे, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. सुशिला नांगरे या सत्यजित देशमुख यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन नांगरे यांनी रणधीर नाईक यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.