शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिगर सभासदांना सभासद करून दाखवा

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

राजू शेट्टी : राजारामबापू साखर कारखान्यास आवाहन; ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

ताकारी : ऊसदर शेतकऱ्यांचा हक्क आहे. एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. यावर्षी ज्या कारखान्यांनी एफआरपीमधून रक्कम कपात केली, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना रक्कम परत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ग्वाही देऊन, राजारामबापू कारखान्याने बिगर सभासदांना सभासद करून घेण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. प्रतापराव बापूराव मोरे अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुका अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडीचे संजय बेले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष भास्कर कदम प्रमुख उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले की, कारखानदार एफआरपीचे तीन तुकडे पाडणार आहेत. तसा ते बेकायदेशीर ठरावही करीत आहेत. आमचा ऊस आणि हक्क यांचा हा कसला न्याय? राजारामबापू कारखान्याने बिगर सभासदांच्या एफआरपी रकमेतून कपात केली. तुम्हाला कारखान्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून १४७ रुपये कापून घेतले आहेत.रविकांत तुपकर म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वत:च्या उसाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या १४ वर्षांपासून ऊस परिषदेमार्फत ऊस दर ठरविण्याचा निर्णय घेतला जातो. यावेळी इस्लामपूर बाजार समितीवर शासन नियुक्त संचालकपदी शिवाजीराव मोरे यांनी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रकाश रसाळ यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी अधिक मोरे, सचिन पवार, गणेश शेवाळे, रवींद्र खराडे, प्रताप कदम, धनाजी मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)एकी दाखवा : खोतसदाभाऊ खोत म्हणाले की, एफआरपी एकरकमी देण्यासाठी संघटना सरकारवर दबाव आणेल, पण एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. कारखानदार जसे एक होतात, तसे शेतकऱ्यांनी यापुढे एकी दाखवावी, अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.